जळगाव, दि. 3 (जिमाका) -
जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या लोकशाही दिनी
जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय
अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. आज झालेल्या लोकशाही दिनी एकूण 196 तक्रार अर्ज दाखल
झाले. यामध्ये प्रामुख्याने सहकार, जिल्हा परिषद, महानगर पालिका, महसुल,
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, पोलीस यासह इतर विभागांच्या तक्रारींचा समावेश
आहे.
या लोकशाही दिनाच्या
कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे
अधिक्षक एस. एल. आढाव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक
भूमि अभिलेख सु. पां. धोंगडे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी केशव
पातोंड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, अग्रणी बँकेचे जिल्हा
प्रबंधक अरुण प्रकाश, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील,
पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. गायकवाड, तहसीलदार (महसुल) मंदार कुलकर्णी, सहायक
प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता सुभाष
राऊत, राज्य परिवहन विभागाचे वाहतुक पर्यवेक्षक व्ही. एन. आंधळे यांचेसह विविध
शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लोकशाही दिनाच्या
कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे
यांनी लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेवून सर्व तक्रार अर्ज संबंधित विभागांकडे पुढील
कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले. या सर्व
तक्रार अर्जांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी. जेणेकरुन
तक्रारदारांना पुन्हा लोकशाही दिनात तक्रार घेऊन येण्याची आवश्यकता भासणार नाही
याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी यावेळी सर्व
संबंधित अधिकारी यांना दिल्यात. त्याचप्रमाणे जी प्रकरणे न्यायालयात न्यायप्रविष्ठ
आहेत अशी प्रकरणे नागरीकांनी लोकशाही दिनात आणू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी
केले आहे.
0000
No comments:
Post a Comment