Wednesday, 26 June 2019

सामाजिक समतेच्या निर्माणासाठी स्वातंत्र्य, समता व बंधुता या मुल्यांचे पालन होणे आवश्यक






     जळगाव, दि. 26 - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय हे मूल्य खऱ्या अर्थाने जीवनमूल्य आहेत. सामाजिक समतेच्या निर्माणसाठी या मुल्यांचा अंगीकार समाजातील सर्व घटकांनी केला पाहिजे. असे प्रतिपादन दीपस्तंभ संस्थेचे संस्थापक यजुर्वेद महाजन यांनी केले.
     सामाजिक न्याय दिनाच्यानिमित्ताने येथील जिल्हा नियोजन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. महाजन बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री केशवराव पातोंड, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्य सचिव श्रीमती वैशाली हिंगे, शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, उपशिक्षणाधिकारी विकास पाटील, सहाय्यक लेखा अधिकारी अधिकारी श्रीमती. मनिषा पाटील, समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्री आर डी पवार, कार्यालय अधिक्षक अरूण वाणी, श्रीमती आशा बोरोले समाज कल्याण निरीक्षक श्री.महेन्द्र चौधरी, समाज कल्याण निरीक्षक, शिक्षक व समा‍ज कल्याण विभागाचे कार्यालयीन कर्मचारी व तालुका समन्वयक मोठया संख्येने उपस्थित होते.
 यावेळी श्री. महाजन पुढे म्हणाले की, सामाजिक समता निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचे पालन केले पाहिजे, या माध्यमातुन आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक समता निर्माण होईल. राजश्री छत्रपती  शाहू महाराजांनी महात्मा फुले यांची विचारधारा स्वीकारुन सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी कार्य सुरु केले. राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारीत प्रसंग सांगून सामाजिक समता, बंधुतासंदर्भात व्याख्या स्पष्ट करून उपस्थित विद्यार्थ्याना भविष्यातील शिक्षणाच्या संधी संदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री केशव पातोंड यांनीही राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारीत घटनांचा उल्लेख करुन विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजन व दीप प्रज्वलीत करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दिशा संस्थेच्या वतीने समतेचा जागर हे गीत सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्य्क लेखा अधिकारी श्रीमती मनिषा पाटील यांनी तर सुत्रसंचालन श्री विनोद ढगे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्री आर डी पवार, श्री अरुण वाणी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समता रॅली संपन्न
       यावेळी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगांव यांचेद्वारा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्म दिनानिमीत्ताने  समता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने येथील जी. एस. ग्राऊंड (शिवतीर्थ) येथून रॅलीस जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी हिरवी  झेंडी दाखवून शुभारंभ केला.  यावेळी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्य सचिव श्रीमती वैशाली हिंगे, शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, उपशिक्षणाधिकारी विकास पाटील, सहाय्यक लेखा अधिकारी अधिकारी श्रीमती. मनिषा पाटील यांचेसह समालकल्याण व शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  समता रॅलीत जळगाव शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी, सामाजीक समतेच्या विविध घोषवाक्यांचे फलक घेवून तसेच शिक्षकवृंद सहभागी झाले होते. दिशा कलापथकाचा कलाकारांनी अग्रस्थानी राहुन विविध प्रबोधानात्मक गीते सादर केली. शिवतीर्थ येथून सुरू झालेल्या समता रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे करण्यात आला.
     या रॅलीस जिल्हा विद्यानिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य एन के पवार, श्री जी आर मराठे, श्री आय एस वाघ, श्री एस बी पाटील, श्री के सी पाटील, श्रीमती एस एस गरुड या शिक्षक वर्गाचे सहकार्य लाभले.
                                                                            000

No comments:

Post a Comment