जळगाव,
दि. 29 :- प्रा. प्रशांतचंद्र महालनोबीस या विख्यात संख्याशास्त्रज्ञाच्या
जन्मदिवस 29 जून हा सांख्यिकी दिन म्हणून
साजरा केला जातो.
प्रा.
महालनोबीस हे देशाच्या नियोजन आयोगाचे सदस्य होते, तसेच त्यांनी कलकत्ता येथे “भारतीय सांख्यिकी संस्था” या संस्थेची
स्थापना केली. दुसरी पंचवार्षिक योजना तयार करण्यामध्ये त्यांचा महत्वपुर्ण सहभाग होता.
भारत सरकारचे ते सांख्यिकी सल्लागार होते. सांख्यिकी मुळे देशाचे नियोजन कशा
प्रकारे करता येते हे त्यांनी दाखवुन दिले. त्यांच्या आयुष्यभराच्या महत्वपुर्ण
कामगिरीमुळे भारत सरकारने त्यांना सन 1968 मध्ये पद्मविभुषण पुरस्कार देऊन गौरविले
होते.
दरवर्षीप्रमाणे
29 जुन सांख्यिकी दिवस नियोजन विभागाद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. नियोजन
विभागाच्या जिल्हा नियोजन समिती व जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत, जिल्हा
नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रतापराव पाटिल, जिल्हा नियोजन अधिकारी, जळगाव हे
होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. वाय. पी. पाटील ( विभाग प्रमुख संख्याशास्त्र
विभाग, नुतन मराठा कॉलेज, जळगाव ), श्री. विलास मोराणकर (उप व्यवस्थापक, गुणवत्ता
नियंत्रण, FBML, जळगाव) व श्री. सुनिल चौधरी (प्रशिक्षक SPEED MATHS, जळगाव)
उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते
प्रतिमेस पूजन व दिप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
डॉ.
वाय. पी. पाटील व श्री. विलास मोराणकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात औद्योगिक
व व्यवहारीक जीवनातील सांख्यिकीच्या महत्वावर प्रकाश टाकला. यानंतर श्री सुनिल
चौधरी यांनी शाश्वत विकासाची ध्येयांतर्गत जीवन आणि पाणी व आरोग्य या विषयांवर
यथोचित मार्गदर्शन केले. श्री. कि. नि.
पाटील ( निवृत्त उपायुक्त नियोजन ) यांनी नियोजन प्रक्रियेतील सांख्यिकीच्या
महत्वावर भाषण दिले.
जिल्हा
सांख्यिकी अधिकारी श्री. प्रमोदराव पाटील यांनी प्रा. महालनोबीस यांच्या
जीवनपटाबद्दल माहिती सांगितली. शेवटी श्री. प्रतापराव पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात
प्रशासकीय कामकाजातील सांख्यिकीचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी
श्री. पी. व्ही. ठोंबरे (जे. टी. महाजन
अभियांत्रीकी महाविद्यालय, फैजपुर ), श्री. एम. पी. चौधरी (जे. टी. महाजन अभियांत्रीकी
महाविद्यालय, फैजपुर ), श्रीमती. अलकनंदा पवार, सहा. जिल्हा नियोजन अधिकारी, श्री.
प्रमोद साठे, संशोधन सहायक, तसेच संचालनालयांतर्गत सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. चेतन देशपांडे
यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालय व जिल्हा
नियोजन समितीमधील सर्व कर्मचा-यांनी
परिश्रम घेतले.
0000
No comments:
Post a Comment