Monday, 3 June 2019

वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती प्रपत्रात भरण्याचे आवाहन


            जळगाव, दि.3 - जिल्ह्यात रब्बी हंगाम 2018 करीता अधिसूचित क्षेत्रातील फळपीकांसाठी हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. 2 जून, 2019 रोजी जळगाव, यावल व चोपडा या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या केळी पिकांच्या नुकसानीच्या बाबतीत कंपनीला सुचित करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रपत्र-2 भरुन ते mhwbcis@aicofindia.com ह्या ईमेल आयडीवर स्कॅन करुन पाठवावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
000

No comments:

Post a Comment