जळगाव,
दि.3 - जिल्ह्यात रब्बी हंगाम 2018 करीता अधिसूचित क्षेत्रातील फळपीकांसाठी हवामानावर
आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. 2 जून, 2019 रोजी जळगाव, यावल व चोपडा
या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या केळी पिकांच्या नुकसानीच्या बाबतीत कंपनीला
सुचित करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रपत्र-2 भरुन ते mhwbcis@aicofindia.com ह्या ईमेल आयडीवर स्कॅन करुन पाठवावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक
कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment