जळगाव, दि. 21 - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत
तालुका/ ग्रामपंचायत स्तरावर असलेल्या अकुशल मजुरांना या योजनेतंर्गत मागणी
प्रमाणे काम उपलब्ध करुन देण्याची तरतुद आहे.
कोणत्याही
अकुशल मजुरांना मनरेगा अंतर्गत काम करावयाचे असेल त्या मजुरांकडे जॉब कार्ड असणे
आवश्यक आहे. मजुराकडे जॉब कार्ड नसलयास ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज सादर करुन मजुराने
जॉब कार्ड प्राप्त करुन घ्यावे. ज्या मजुरांकडे जॉब कार्ड आहेत आणि मनरेगा अंतर्गत
काम करावयाचे असल्यास त्यांनी संबंधित ग्रामसेवक/ रोजगार सेवक, पंचायत समिती,
तहसिल कार्यालय यांचेकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत
काम उपलब्ध करुन देणेसाठी लेखी अर्ज सादर करावा. अथवा टोल फ्री क्रमांक 1800 22
3839 यावर कामाची मागणी नोंदवावी. संबंधित मजुरांना मागणीप्रमाणे काम उपलब्ध करुन
देण्यात येईल. असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी
प्रत्रकान्वये कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment