जळगाव, दि.27 - कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे
अधिपत्याखालील धुळे व नंदूरबार जिल्हयातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, कोल्हापूर
पध्दतीचे बंधारे व वळण बंधा-यावरील अधिसुचित नदी, नाले तसेच तापी नदीवरील मंजूर
उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचा फायदा घेणाऱ्या बागायतदारांनी सुरु झालेल्या खरीप
हंगामासाठी 1 मार्च 2019 ते 30 जून 2019 पर्यंत पाणी अर्ज सादर करावेत. असे आवाहन
कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी केले आहे.
सर्व
बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा
कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात 15 एप्रिल, 2019 पर्यंत सादर करावेत.
बागायतदारांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल. बागायतदांरानी
आपआपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. मंजुरी व पाणी पुरवठ्याबाबत
अन्नधान्ये, भुसार, चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर
पास मिळालेशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व व्याज भरणे
आवश्यक आहे. टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा
लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही.
लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत
नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्ज क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार
पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पध्दतीने
पाणी देण्यात येईल.असेही कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment