जळगाव, दि. 15 - औरंगाबाद क्षेत्र संबंधीत टपाल सेवेविषयी अथवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद यांनी त्यांच्या कार्यालयात दिनांक 26 मार्च, 2019 रोजी दुपारी 3.00 वाजता डाक अदालत आयोजित केली आहे.
नागरिकांनी आपल्या तक्रारी संपूर्ण माहितीसह दोन प्रतीत एस. एस. परळीकर, सहाय्यक निदेशक डाकसेवा (ज. शि) पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, औरंगाबाद - 431002 या पत्त्यावर दि. 25 मार्च पुर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहितीसाठी www.maharashtrapost.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद क्षेत्र, औरंगाबाद यांनी कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment