जळगाव,
दि. 13 - जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागामार्फत पशुगणना -2019 करण्याचे काम सुरु आहे.
जिल्ह्यातील पशुगणनेचे काम 31 मार्च, 2019 अखेर पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त,
पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिलेले आहेत.
पशुसंवर्धन
विभागाला पशुगणनेचे नियोजन करावे लागते. तसेच
दुष्काळी परिस्थितीत उपाय योजना
करण्यासाठी पशुगणना करणे गरजेची असते. यावर्षीची पशुगणना-2019 ही टॅबवर करण्यात
येत आहे. तेव्हा जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालक व पशुधन नसलेल्या रहिवाश्यांनीही
पशुगणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन
उपआयुक्त, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment