जळगाव, दि. 5- व्यापारी आणि ग्राहक यांच्यामधील संघर्ष टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी इलेक्टॉनिक काट्यांचा वापर करण्यास प्राधान्य
द्यावे. असे आवाहन अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले.
जिल्हा ग्राहक संरक्षण
परिषदेची बैठक श्री. गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील
सभागृहात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा पुरवठा
अधिकारी सूनिल सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब
बोटे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन व्ही.टी.जाधव, दुरसंचार विभागाचे
अे.जे.पाटील, वैधमापन विभागाचे सहाय्यक नियंत्रक रा.भ.बांगर, जिल्हा कृषि अधिकारी
कार्यालयाच्या श्रीमती. कावेरी राजपूत, सहाय्यक
प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, अशासकीय सदस्य राहुल बोरसे, डॉ.अर्चना
पाटील, सौ.पल्लवी चौधरी, ॲड.मुजुळा मुंदडा, विकास महाजन, रमेश सोनवणे, बाळकृष्ण
वाणी, शिवाजीराव अहिराव, सतीश गडे, सौ.उज्वला देशपांडे, विजय मोहरिर, डॉ. प्रिती
दोषी, सतीष देशमुख, विकास कोटेचा, नरेंद्र पाटील यांच्यासह पोलीस तसेच महसूल
प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी अपर जिल्हाधिकारी
गोरक्ष गाडीलकर यांनी मागील सभेतील परिवहन विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, गॅस
वितरण, स्वस्त धान्य दुकाना संदर्भातील तक्रारींचा आढावा घेतला.
अशासकीय सदस्यांकडून
उपस्थित पॅथॉलॉजी, पेट्रोलपंप, विद्यार्थ्यांच्या बस सुविधा, आठवडे बाजार,
सार्वजनिक स्वच्छतागृहे आदि विषयांवर आलेल्या तक्रारी तसेच सुचना स्वीकारल्या
.तसेच आजच्या बैठकीत उपस्थित तक्रारींचे निराकरण पुढील बैठकीपूर्वी करून वंचितांना
न्याय द्यावा. अशा सूचना अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलवार यांनी सर्व संबंधित
विभागांना दिल्या
0000
No comments:
Post a Comment