जळगाव, दि.13 - मुद्रण मालकांनी निवडणूक काळात
उमेदवारांचे व पक्षाचे प्रचार साहित्य छपाई करताना कुणाचीही मानहानी होवू नये. तसेच सामाजिक सलोखा अबाधित राहिल याची दक्षता
घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुद्रण
मालकांच्या बैठकीत ये बोलत होते. याप्रसंगी जिल्हातील मुद्रण मालक, त्यांचे
प्रतिनिधीसह उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, निवडणूक शाखेतील अधिकारी,
कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे पुढे
म्हणाले की, निवडणूकीसाठी छपाई केलेल्या
प्रचार साहित्याच्या 4 प्रती छपाईनंतर 3 दिवसाच्या आत निवडणूक कार्यालयातील
आचारसंहिता कक्ष, हिशोब शाखेकडे सादर करणे आवश्यक आहे. तालुकास्तरावरील
मुद्रकांनी त्यांच्याकडे छपाई केलेले
प्रचार साहित्य आप-आपल्या तालुक्यांच्या
तहसिल कार्यालयातील आचारफसंहिता कक्षामार्फत बंद लिफाफ्यातून जळगाव येथील निवडणूक
शाखेकडे पाठवावे.
निवडणूक काळात जिल्ह्यातील सर्व
मुद्रकांनी लोकप्रतिनीधीत्व अधिनियम 1951 चे कलम 127 चे काटेकोरपणे पालन
करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सर्व संबंधितांना दिल्यात.
00000
No comments:
Post a Comment