जळगाव,
दिनांक 18 : शासनाच्या विविध योजना
गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक
सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोक संवाद’ साधून जाणून
घेणार आहेत. त्यासाठी या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय
मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. 1 जानेवारी
2019 रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधणार आहेत.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध
योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी
व ग्रामीण), उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान
योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण,गाळयुक्त
शिवार, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, सूक्षम सिंचन आणि मृदा
परीक्षण सारख्या या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य
शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे. आता या
विविध योजनेतील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री थेट संवाद साधणार असून 1 जानेवारी रोजी
प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाद्वारे याचा
शुभारंभ होणार आहे.
मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची
इच्छा असणाऱ्या आणि प्रधानमंत्री आवास योजना व त्यासाठी राज्य शासनाने सुरु
केलेल्या इतर पूरक योजना यांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपले नाव, संपर्क
क्रमांक-पत्ता आणि योजनेचा लाभ घेतल्याची
माहिती av.dgipr@maharashtra.gov.in या ईमेलवर आणि 8291528952 या व्हॉटसॲप
क्रमांकावर दिनांक 28 डिसेंबरपर्यंत पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाने केले आहे.
जिल्ह्यातील इच्छूक लाभार्थी त्यांची
माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या djdiojalgaon@gmail.com या मेलवरही दि. 28
डिसेंबरपर्यंत माहिती पाठवू शकतील. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपली माहिती पाठवावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले
आहे.
० ० ० ० ०
No comments:
Post a Comment