जळगाव, दि. 3 (जिमाका) - दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या लोकशाही दिनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी तक्रारदारांच्या जागेवर जावून जाणून घेतल्या. आज झालेल्या लोकशाही दिनी एकूण 239 तक्रार अर्ज दाखल झाले. यामध्ये सहकार, जिल्हा परिषद, मनपा, महसुल, कृषि, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, पोलीस यासह इतर विभागांच्या तक्रारींचा समावेश आहे.
या लोकशाही दिनास अपर पोलीस अधिक्षक लोहित मतानी, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, महापालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, चिटणीस मंदार कुलकर्णी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर अग्रणी बँकेचे सह व्यवस्थापक श्री. भावसार यांचेसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लोकशाही दिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेतला. लोकशाही दिनी प्राप्त तक्रारी सर्व संबंधित विभागांकडे पाठविण्यात आल्यानंतर त्या तक्रार अर्जांवर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिलेत.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी यावर्षी लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या अर्जांचा आढावा घेतला. त्यानुसार जानेवारी ते नोव्हेंबर 2018 या अकरा महिन्याच्या कालावधीतील एकूण 608 अर्ज प्रलंबित आहे. यामध्ये सर्वाधिक सहकार विभाग 256 अर्ज, जिल्हा परिषद 210 अर्ज, महापालिका 43 अर्ज, जिल्हा अग्रणी बँक 20 अर्ज, भूमि अभिलेख 14 अर्ज, पोलीस 13 अर्ज, कृषि 9 अर्ज, जिल्हा उद्योग केंद्र 7 अर्ज प्रलंबित आहे. सर्वाधिक प्रलंबित अर्ज असलेल्या विभागांकडील अर्जांवर तातडीने कार्यवाही होण्यासाठी या विभागांची स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिलेत.
०००
या लोकशाही दिनास अपर पोलीस अधिक्षक लोहित मतानी, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, महापालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, चिटणीस मंदार कुलकर्णी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर अग्रणी बँकेचे सह व्यवस्थापक श्री. भावसार यांचेसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लोकशाही दिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेतला. लोकशाही दिनी प्राप्त तक्रारी सर्व संबंधित विभागांकडे पाठविण्यात आल्यानंतर त्या तक्रार अर्जांवर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिलेत.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी यावर्षी लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या अर्जांचा आढावा घेतला. त्यानुसार जानेवारी ते नोव्हेंबर 2018 या अकरा महिन्याच्या कालावधीतील एकूण 608 अर्ज प्रलंबित आहे. यामध्ये सर्वाधिक सहकार विभाग 256 अर्ज, जिल्हा परिषद 210 अर्ज, महापालिका 43 अर्ज, जिल्हा अग्रणी बँक 20 अर्ज, भूमि अभिलेख 14 अर्ज, पोलीस 13 अर्ज, कृषि 9 अर्ज, जिल्हा उद्योग केंद्र 7 अर्ज प्रलंबित आहे. सर्वाधिक प्रलंबित अर्ज असलेल्या विभागांकडील अर्जांवर तातडीने कार्यवाही होण्यासाठी या विभागांची स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिलेत.
०००
No comments:
Post a Comment