जळगाव, दि. 13 - हतनूर धरण क्षेत्रात गेल्या काही दिवासांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून आज 35715 व्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु असून यामुळे धरणाचे दहा गेट पूर्ण उघडण्यात आले आहे. तर 16 गेट एक मीटरने उघडण्यात आल्याची माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यात
हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहे. अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर,
अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गुळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा
मध्यम प्रकल्प आहे. तर 96 लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय
उपयुक्त साठा 1427.51 दलघमी म्हणजेच 50.40 टीएमसी इतका आहे.
जिल्ह्यातील
मोठया प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 1027.10 दलघमी म्हणजेच 36.26 टीएमसी
इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 178.11 दलघमी म्हणजेच 6.29 टीएमसी उपयुक्त
साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात 1.41 टीएमसी, गिरणा 1.81 टीएमसी, तर वाघूर धरणात 3.07
टीएमसी उपयुक्त साठा आहे.
तसेच
जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 203.91 दलघमी म्हणजेच 7.20
टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 30.65 दलघमी म्हणजेच 1.08 टीएमसी इतका
उपयुक्त साठा आहे. गेल्या 1 जून पासून आजपर्यत हतनूर धरणाच्या क्षेत्रात 93 मिमी
इतका पाऊस पडला आहे.
000
No comments:
Post a Comment