Wednesday, 11 July 2018

सोयाबीनचे बियाणे दरवर्षी बदलण्याची आवश्यकता नाही कृषि विभागाची माहिती

          जळगाव, दि. 11 - सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असुन याचे सर्वच वाण हे सरळ वाण आहेत. त्यामुळे अशा वाणाचे बियाणे दरवर्षी बदलणे आवश्यक नसते. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे शेतक-यांना पुढील दोन ते तीन वर्षांपर्यत वापरता येते.
     त्यामुळे खरीप हंगाम 2018 मध्ये शेतकऱ्यांना स्वत: जवळील सोयाबीन बियाणांचा वापर करता येईल. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
                                                                      000

No comments:

Post a Comment