Wednesday, 4 July 2018

भारतीय टपाल विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत


         जळगाव, दि. 4 - भारतीय डाक विभागामार्फत राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मेरे देश के नाम खत” ( Letter to my motherland) हा स्पर्धेचा विषय असून कोणीही व्यक्ती या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. सदर लेखन हे मराठी इंग्लिश, हिंदी या तिन्ही भाषेत करता येणार आहे. स्पर्धेसाठी फक्त आंतरदेशीय पत्र किंवा पोस्टाच्या लखोट्याचा वापर करावा. पोस्टाच्या लखोट्याचा वापर करतांना ए-4 साईज कागदावरच पत्र लिहायचे असून शब्दाची मर्यादा अन्तरदेशीय पत्र 500 शब्द आणि पोस्टाच्या लखोट्यासाठी 1 हजार शब्द असावयास हवे. फक्त हाताने लिहिलेलेच पत्र स्वीकारले जाईल.
            ही स्पर्धा दोन गटात होणार आहे. पहिला गट वय 18 वर्षापर्यंत  व दुसरा गट वय 18 वर्षावरील असे असणार आहे.
     स्पर्धकांनी दिनांक 1 जानेवारी, 2018 ला 18 वर्षावरील / वर्षाखालील गटात समाविष्ट होतो, असा दाखला सोबत देणे आवश्यक आहे. पत्र पाठवण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2018 आहे. यानंतर पोस्ट केलेले पत्र ग्राह्य धरले जाणार नाही. पत्र पोस्टाव्दारे मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र व गोवा सर्कल ऑफिस, मुंबई 400001 या पत्यावर पाठवावे. पत्र लेखनाची स्कॅन कॉपी सुध्दा My Govportal  ला दिनांक 30 सप्टेंबर, 2018 पर्यत पोहचेल या बेताने पाठविता येईल. तथापि, पत्राची हार्ड कॉपी सुध्दा पाठवणे गरजेचे आहे. ज्यावर पत्र पाठविल्याचा पोस्टाचा 30 सप्टेंबर, 2018 चा शिक्का असावा.
            या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस रु. 25हजार (प्रत्येक प्रकारात), दुसरे क्रमांकाचे बक्षीस रु 10 हजार (प्रत्येक प्रकारात), तृतीय क्रमांकाचे बक्षीस रु. 5 हजार ( प्रत्येक प्रकारात) अशी बक्षिस दिली जाणार आहेत. जास्तीत जास्त  विद्यार्थांनी / नागरिकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांनी केले आहे.
            अधिक माहितीसाठी डाक अधिक्षक कार्यालय, जळगाव यांचा फोन नंबर 0257-2229679/ 2224288 वर संपर्क साधावा. असे डाक अधिक्षक, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment