जळगाव, दि: 4 - तेरा कोटी
वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या मोहिमेस आज जिल्ह्यात व्यापक स्वरुप प्राप्त झाले असून
जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. याचे दृश्य
स्वरुप म्हणजे जिल्ह्यात अवघ्या चार दिवसात 5 लाख 34 हजार 810 वृक्षांची लागवड
करण्यात आल्याची माहिती जळगाव विभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी
किशोर राजे निंबाळकर यांनी जळगाव व यावल येथील उप वनसंरक्षकांशी चर्चा करुन तेरा कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा
घेतला. त्याचबरोबर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची
माहिती दिली. रावेर, यावल, चोपडा या भागात ही मोहिम व्यापक स्वरुपात राबविण्यात
येत असल्याचे यावल विभागाचे उपवनसंरक्षक संजय दहिवले यांनी सांगितले.
13
कोटी वृक्ष लागवड मोहिमेस जिल्ह्यातील नागरीकांचा उत्स्फुर्त सहभाग मिळत असून या
मोहिमेस लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त होत असल्यानेच अवघ्या चार दिवसात जिल्ह्यात 5
लाख 34 हजार 810 वृक्षांची लागवड झाली आहे. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यात वन
विभागामार्फत 4 लाख 12 हजार 223, जलसंपदा विभागामार्फत 3 हजार 370, सहकार व पणन
विभागामार्फत 1 हजार 654, ग्रामपंचायतीमार्फत 1 हजार 125, सामाजिक वनीकरण
विभागामार्फत 99 हजार 232 तर वन्यजीव 11 हजार, महसुल विभागामार्फत 1 हजार 50, नगरविकास
विभागामार्फत 2 हजार 585, जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांनी 1 हजार 618
वृक्षांची लागवड केली आहे.
जिल्ह्यात
पावसाचे आगमन झाल्याने आता ग्रामपंचायत पातळीवर वृक्ष लागवड मोहिम व्यापक स्वरुपात
राबविण्यात येऊन देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यात येईल. अशी माहिती
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी दिली.
000
No comments:
Post a Comment