पुणे, दि. 11 - पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) सुधारीत स्वरुपात कृषि विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत यावर्षी राबविण्यात येत आहे. मागील वर्षी बीटी कपाशीवर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. चालू हंगामात कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळी नियंत्रणाच्या दृष्टीने जुलै व ऑगस्ट महिने अत्यंत महत्वाचे असून त्यानुषंगाने शेतकऱ्यांना कृषि विभागाच्यावतीने पुढील आवाहन करण्यात आले आहे.
यावर्षी शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच त्याचे पुढील संक्रमण टाळण्यासाठी प्रथम प्राधान्याने ज्या शेतकऱ्यांनी कापसाची पेरणी लवकर केली आहे. त्यांनी पाते लागण्याच्या वेळेस प्रतिबंधक उपाय योजना म्हणून 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे फवारणी केलेल्या क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. निंबोळी अर्काची फवारणी हा सर्वात स्वस्त व सहज साध्य उपाय आहे. निंबोळी अर्क तयार करण्यासाठी कृषि विभागाचे तसेच कृषि विद्यापिठाच्या व कृषि विज्ञान केंद्राच्या तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
पूर्व हंगामी तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेल्या विशेषत: खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार त्याचबरोबर जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यात कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने अशा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाकडून तालुका पातळीवर तातडीने सर्वेक्षण व मास ट्रपिंगसाठी फेरोमेन सापळे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, त्याचा वापर करुन बोंडअळी नियंत्रणाबाबतच्या उपाय योजना हाती घेण्यात याव्यात. जेणेकरुन, भविष्यात होणारा किडीचा प्रसार रोखण्यास मदत होईल. जिनींग मिलमध्ये फेरोमेन सापळे तसेच प्रकाश सापळे यामध्ये शेंदरी बोंडअळीचे पतंग आढळून येत आहेत त्यामुळे शेतक¬यांनी शेंदरी बोंडअळी नियंत्रणाच्या उपाय योजना तात्काळ कराव्यात. एम-किसानच्या माध्यमातून कृषि विभागाने दिलेल्या संदेशाप्रमाणे शेतकरी बंधुनी उपाय योजनांची अंमलबजावणी करावी.
कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळी नियंत्रणासाठी कृषि विभागाबरोबरच शेतकरी, कृषि विज्ञान केंद्र, शासकीय तसेच खाजगी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच, निविष्ठा उत्पादक व विक्रेते यांनी पुढाकार घेऊन मोहिम स्वरुपात सर्वांनी काम करण्याचे आवाहन आयुक्त, कृषि, महाराष्ट्र राज्य यांनी केले असल्याचे विजय घावटे, कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
यावर्षी शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच त्याचे पुढील संक्रमण टाळण्यासाठी प्रथम प्राधान्याने ज्या शेतकऱ्यांनी कापसाची पेरणी लवकर केली आहे. त्यांनी पाते लागण्याच्या वेळेस प्रतिबंधक उपाय योजना म्हणून 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे फवारणी केलेल्या क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. निंबोळी अर्काची फवारणी हा सर्वात स्वस्त व सहज साध्य उपाय आहे. निंबोळी अर्क तयार करण्यासाठी कृषि विभागाचे तसेच कृषि विद्यापिठाच्या व कृषि विज्ञान केंद्राच्या तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
पूर्व हंगामी तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेल्या विशेषत: खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार त्याचबरोबर जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यात कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने अशा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाकडून तालुका पातळीवर तातडीने सर्वेक्षण व मास ट्रपिंगसाठी फेरोमेन सापळे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, त्याचा वापर करुन बोंडअळी नियंत्रणाबाबतच्या उपाय योजना हाती घेण्यात याव्यात. जेणेकरुन, भविष्यात होणारा किडीचा प्रसार रोखण्यास मदत होईल. जिनींग मिलमध्ये फेरोमेन सापळे तसेच प्रकाश सापळे यामध्ये शेंदरी बोंडअळीचे पतंग आढळून येत आहेत त्यामुळे शेतक¬यांनी शेंदरी बोंडअळी नियंत्रणाच्या उपाय योजना तात्काळ कराव्यात. एम-किसानच्या माध्यमातून कृषि विभागाने दिलेल्या संदेशाप्रमाणे शेतकरी बंधुनी उपाय योजनांची अंमलबजावणी करावी.
कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळी नियंत्रणासाठी कृषि विभागाबरोबरच शेतकरी, कृषि विज्ञान केंद्र, शासकीय तसेच खाजगी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच, निविष्ठा उत्पादक व विक्रेते यांनी पुढाकार घेऊन मोहिम स्वरुपात सर्वांनी काम करण्याचे आवाहन आयुक्त, कृषि, महाराष्ट्र राज्य यांनी केले असल्याचे विजय घावटे, कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment