Monday, 9 July 2018

आणिबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या व्यक्तींना मिळणार दरमहा दहा हजार रुपये मानधन, मानधनासाठी अर्ज करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


          जळगाव, दि. 9 - भारतामध्ये 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या कालावधीत आणिबाणी घोषित करण्यात आली होती. या कालावधीत ज्या व्यक्तींना कारावास सोसावा लागला, अशा व्य्क्तींचा सन्मान/यथोचित गौरव करण्याचे धोरण राज्य शासनाने ठरविले असून तसा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
          त्यानुसार आणिबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक दहा हजार रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस/पतीस पाच हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. तसेच एक महिन्यापेक्षा कमी करावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक पाच हजार रुपये, तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस/पतीस अडीच हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे.             
          जिल्ह्यातील ज्या व्यक्तींनी मिसा अतंर्गत कारावास भोगला आहे. त्यांनी मानधनासाठी अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे अर्ज करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी एका प्रसिध्दी  पत्रकान्वये केले आहे.
000

No comments:

Post a Comment