जळगाव, दि. 5:- गतवर्षी कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव ही
आपल्या राज्यावर आलेली मोठी आपत्ती होती. त्यामुळे आपल्या शेतक-यांचे तसेच
राज्याचेही मोठे नुकसान झाले आहे. भविष्यात शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी कृषि विभाग, कृषि विद्यापिठे, शेतकरी, जिनर्स, कापूस बियाणे
पुरवठादार, किटकनाशके विक्रेते इ. सर्व स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे.
यावर्षी
शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच त्याचे पुढील संक्रमण टाळण्यासाठी प्रथम प्राधान्याने ज्या शेतकऱ्यांनी
कापसाची पेरणी लवकर केली आहे. त्यांनी पाते लागण्याच्या वेळेस प्रतिबंधक उपाय
योजना म्हणून 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे फवारणी
केलेल्या क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. निंबोळी अर्काची
फवारणी हा सर्वात स्वस्त व सहज साध्य उपाय आहे. निंबोळी अर्क तयार करण्यासाठी कृषि
विभागाचे मार्गदर्शन घ्यावे, असे कृषि उपसंचालक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,
जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment