जळगाव, दि. 7 – शासनाने
खरीप हंगाम 2018 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात
राबविण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेत कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची
अंतिम मुदत दिनांक 31 जुलै व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत
24 जुलै 2018 आहे.
खरीप हंगाम 2018 मध्ये जळगाव जिल्ह्यात
ही योजना ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड दुरध्वनी क्र. 020-41320084 टोल फ्री
क्र. 1800118485 यांचेकडून राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्यानी
या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
०००
No comments:
Post a Comment