Saturday, 7 July 2018

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 24 जुलै


      जळगाव, दि. 7 – शासनाने खरीप हंगाम 2018 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेत कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक 31 जुलै व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत 24 जुलै 2018 आहे.
            खरीप हंगाम 2018 मध्ये जळगाव जिल्ह्यात ही योजना ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड दुरध्वनी क्र. 020-41320084 टोल फ्री क्र. 1800118485 यांचेकडून राबविण्यात येणार आहे.
            जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्यानी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
०००

No comments:

Post a Comment