जळगाव, दि.3 :-विभागीय व जिल्हास्तरावर इयत्ता 12 वी नंतर
पुढे शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या
विद्यार्थ्यांसाठी पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना सन 2016-17 या शैक्षणिक
वर्षापासून आदिवासी विभागाव्दारे लागू केलेली आहे.
इयत्ता 12 वी नंतरच्या सर्व अभ्यासक्रमासाठी निकाल लागल्यापासून 1
महिन्याचे आत http://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळाव्दारे ऑनलाईन अर्ज नोंदणी
करावयाची आहे. नवीन विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर अर्ज भरण्याकरिता प्रथम
नोंदणी ( registration) करावी. नावनोंदणी नंतर प्राप्त user id व password चा उपयोग करुन अर्ज भरावा. योजनेमध्ये अर्ज
भरण्यासाठी Hostel Admission किंवा swayam
या पैकी swayam हा पर्याय निवडून काळजीपूर्वक अर्ज भरावा.
पंडित दिनदयाळ उपाध्याय
स्वयंम योजना ग्रामीण तथा तालुकास्तरावर शासन निर्णयानुसार तुर्तास तरी लागू
नसल्याने तालुकास्तरावरील व ग्रामीणस्तरावरील शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेणा-या
विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज भरावा. जे विद्यार्थी सन 2016-17 व सन
2017-18 पासून योजनेमध्ये प्रवेशीत आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांनीदेखील सन
2018-19 या शैक्षणिक वर्षातदेखील (जुने विद्यार्थी म्हणून) renew application मध्ये अर्ज भरणे आवश्यक आहे. स्वयंम योजनेसाठी अर्ज करतांना ऑनलाईन
प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे (उदा.मागील वर्षी मिळालेली
गुण / गुणपत्रिका, जात वैधता प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र क्रमांकासहित, टी.सी,
चालू वर्षी प्रवेश घेतलेल्या शाळा / महाविद्यालयाचे बोनाफाईड / प्रवेश पावती,
आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बॅंकेतील आधारसंलग्न खात्याचे पासबुक इ. झेरॉक्स) व इतर
आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्यांनी सोबत बाळगावी. पालकांचे घोषणापत्र हे विहित
नमुन्यातच असावे. सदरच्या घोषणापत्रांचा नमुना मिळवण्यासाठी जिल्हास्तरावरील वसतीगृह तसेच प्रकल्प
कार्यालयाशी संपर्क साधावा.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी व शर्तीची पूर्तता करणे
आवश्यक आहे.
अटी
व शर्ती
विद्यार्थींनी/ विद्यार्थी हे अनुसूचित जमातीचे असावे, विद्यार्थ्यांकडे
जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, विद्यार्थ्यांचे पालकांचे वार्षिक उत्पन्न
मर्यांदा 2.50 लाखांच्या आत असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत
खाते असणे बंधनकारक आहे. व सदरचे खाते आधारकार्डशी संलग्न असावे. विद्यार्थ्यांने
प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे. अशा शहरातील सदर
विद्यार्थ्यांचे पालक रहिवासी नसावेत. सदर विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च
शिक्षण घेत असावा, तथापि एका विद्यार्थ्यांस जास्तीत जास्त 7 वर्ष सदर योजनेचा लाभ
घेता येईल.
विदयार्थ्याची कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे. आदिम
जमातीच्या व अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ प्राथम्याने
देय राहिल. विद्यार्थ्यांर्ची संस्थेमधील / महाविद्यालयातील उपस्थिती 80 टक्के
पेक्षा अधिक असणे आवश्यक राहिल. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेल्या संस्था
मान्यताप्राप्त महाविद्यालय / संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी
विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांने आदिवासी विकास विभागाच्या
संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांस आदिवासी
विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा शैक्षणिक संस्थेच्या
वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी
किंवा व्यवसाय करत नसावा. एका शाखेची पदवी मध्येच सोडून दुस-या शाखेच्या पदवीसाठी
प्रवेश घेतल्यास किंवा एका शाखेची पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर
इतर शाखेच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास सदर योजनेचा लाभ
मिळणार नाही.
केंद्र
शासनाच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीकरता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल. तथापि दोन
वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. सदर
योजनेमध्ये विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांची फसवणूक केल्याचे आढळून आल्यास संबंधित
विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहतील. असे प्रकल्प
अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल आर बी हिवाळे यांनी एका प्रसिद्धी
पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment