जळगाव,
दि: 7 - तेरा कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या मोहिमेस आज जिल्ह्यात व्यापक स्वरुप
प्राप्त झाले असून जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यात येत
आहे. याचे दृश्य स्वरुप म्हणजे जिल्ह्यात अवघ्या सात दिवसात 9 लाख 38 हजार 99
वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहिती जळगाव विभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार
यांनी दिली आहे.
13
कोटी वृक्ष लागवड मोहिमेस जिल्ह्यातील नागरीकांचा उत्स्फुर्त सहभाग मिळत असून या
मोहिमेस लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त होत असल्यानेच अवघ्या सात दिवसात जिल्ह्यात 9
लाख 38 हजार 99 वृक्षांची लागवड झाली आहे. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यात वन
विभागामार्फत 6 लाख 81 हजार 119, जलसंपदा विभागामार्फत 14 हजार 320, सहकार व पणन
विभागामार्फत 7 हजार 658, ग्रामपंचायतीमार्फत 25 हजार 125, सामाजिक वनीकरण
विभागामार्फत 1 लाख 73 हजार 403 तर वन्यजीव 23 हजार 950, महसुल विभागामार्फत 1
हजार 50, आदिवासी विकास विभाग 1 हजार 300, उर्जा विभाग 2 हजार 35, नगर विकास विभाग
2 हजार 649, पशु संवर्धन, दुग्धविकास व मत्सव्यवसाय विभाग 837, आरोग्य विभाग 542,
जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांनी 3 हजार 637 वृक्षांची लागवड केली आहे.
जिल्ह्यात
आता ग्रामपंचायत पातळीवर वृक्ष लागवड मोहिम व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार असून
जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत
पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती श्री. पगार यांनी दिली आहे.
000
No comments:
Post a Comment