Tuesday, 12 September 2017

शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन



जळगाव, दि: 12:- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर असल्याने जिल्हयातील शेतकऱ्यांनी आपले अर्ज वेळेत भरण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी केले आहे.
जिल्ह्यात आपले सरकार वेबपोर्टल, महाऑनलाईन केंद्र, कॉमन सर्विस सेंटर या केंद्रावर विनामुल्य ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्व शेतकरी बांधवांनी जवळच्या केंद्रावर जाऊन ऑनलाईन अर्ज मुदतीत भरून घ्यावेत.
            या योजनेमध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँका तसेच खाजगी बँका यांनी 1 ते 66 नमुन्यामधील कर्जदार शेतकऱ्यांची माहिती 15 सप्टेंबर पर्यंत भरुन घ्यावयाची आहे.
          या योजनेतंर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 15 सप्टेंबर पर्यंत असल्याने जिल्ह्यातील सर्व कर्जदार शेतकरी सभासदांनी तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्था व सर्व बॅंकांनी कालमर्यादेचे पालन करून कर्जमाफीचे अर्ज भरुन घेण्याचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन श्री. जाधवर यांनी केले आहे.    
000

No comments:

Post a Comment