जळगाव दि. 15 :- वीजेचा जनतेच्या दैनंदिन
जीवनात सहभाग असतो विद्युत विभागातील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांनी जनतेशी
सुसंवाद ठेवल्यास जनतेच्या अनेक अडचणी कमी होवून त्यांचे जीवनमान सुसाह्य होईल.
यासाठी जनतेशी सुसंवाद साधावा अशा सुचना सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील
यांनी आज विद्युत विभागांचा अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिल्या. विद्युत
विभागाच्या विविध योजनांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी येथील अजिंठा विश्रामगृहात
त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी
जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, अधिक्षक अभियंता दत्तात्रय बनसोडे,
कार्यकारी अधियंता श्री. नारायणे, धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.
कुलकर्णी, जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता. श्री. तडवी, ग्रामीण जळगाव उपविभाग,
उप कार्यकारी अभियंता श्री. एस के. पाटील, नशिराबाद उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता
श्री.खंडारे, जळगाव शहरचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री.इंगळे, जळगावचे
तहसिलदार अमोल निकम हे उपस्थित होते.
ना.
पाटील बैठकीत मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले भारनियमांचे वेळापत्रकाची
प्रभावीपणे प्रसिद्धी करावी. नवीन वीज जोडणी, धोकादायक वीज वाहिन्या, त्वरीत दूरुस्त
कराव्यात, अवास्तव येणारी वीज देयकांबाबत दिलासादायक निर्णय घ्यावेत. दुर्गा
उत्सवात भारनियमन होणार नाही. यासाठी नियोजन करावे. ग्राहकांच्या तक्रारींना
संवेदनशिलपणे सामोरे जावे या बैठकीत विटनेर, शेळगाव, असोदा, भादली,
कानसवाडे, कडगाव आदि पाणीपुरवठा योजनेविषयी चर्चा झाली. एकात्मिक उर्जा विकास
कार्यक्रमांअंतर्गत धरणगाव व जळगाव तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विविध
कामांची प्रगती, नवीन ट्रान्सफॉर्मर, प्रस्तावित नवीन उपकेंद्र, उपकेंद्रांची
क्षमतावाढ, पंडीत दिनदयाळ उपाध्याय योजना अंतर्गत प्रस्तावित कामे, विशेष घटक
योजने अंतर्गत प्रस्ताव देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीनी योजना समाजातील
घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे. असे त्यांनी शेवटी सांगितले.
०००००
No comments:
Post a Comment