मुंबई, दि. 18 :
जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित विविध प्रश्नांबाबत महसूल मंत्री तथा जळगावचे
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनामध्ये बैठक
घेतली.
यावेळी
जळगांव महानगरपालिकेने घेतलेल्या हुडको कर्जाबाबत, 25 कोटी विशेष निधीबाबत, अमृत अभियान
पाणी-पुरवठा योजना, अमृत
मल-निस्सा:रण योजना,बोदवड नगर पंचायतीचे प्रश्न, जळगाव
महानगरपालिकेतील विविध रिक्त पदे भरणे,जळगाव जिल्ह्यातील पाणी-टंचाई, मेहरुण तलाव
सुशोभिकरण, जळगाव-
भुसावळ तिसरी रेल्वे लाईन, महसूल
विभागातील विविध रिक्त पदे भरणे, जामनेर, यावल,चोपडा, भुसावळ, जळगाव येथील
नवीन प्रशासकीय इमारती बांधणे, चाळीसगांव
येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची
जागा शिवस्मारकासाठी देणे, शिवाजी नगर
व पिप्रांळा येथे रेल्वे उड्डाणपूल बांधणे, जळगाव जिल्ह्यात पशुवैद्यकीय विद्यालय बांधणे,लिंबूवर्गीय फळांचे संशोधन केंद्र
चाळीसगांव येथे उभारणे, इत्यादी
विषयांवर चर्चा झाली.
जळगांव
जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे 30 सप्टेंबरनंतर टंचाई परिस्थितीस मुदतवाढ देण्याचा
निर्णय यावेळी घेण्यात आला. महानगरपालिकेस मिळालेला 25 कोटी विशेष निधी स्थानिक
पातळीवर समन्वयाने खर्च करण्याबाबत निर्देश त्यांनी दिले. पाणी पुरवठा
व मलनिस्सारण योजना यांचे कार्यारंभ आदेश त्वरीत देऊन कामे लवकरात लवकर पूर्ण करणे, मेहरुण तलाव
सुशोभिकरण प्रस्ताव टप्प्या-टप्प्याने सादर करणे, महानगर पालिकेची रिक्त पदे भरणे, आदींबाबतही यावेळी चर्चा झाली.
या बैठकीस
माजी मंत्री तथा आमदार सर्वश्री एकनाथराव खडसे, राजूमामा भोळे, श्रीमती स्मिताताई वाघ, उन्मेष पाटील, हरीभाऊ जावळे, महापौर ललित कोल्हे, माजी महापौर नितिन लढ्ढा, सभागृह नेते
रमेश जैन, जिल्हाधिकारी
किशोरराजे निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment