Wednesday, 27 September 2017

युवकांनी आपले संस्कार जोपासण्याबरोबरच वृद्धींगत करावे- जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर






          जळगाव दि. 27:- बालपणी आपल्यावर केलेले संस्कार युवा अवस्था आल्यानंतरही जोपासून वृध्दींगत करावे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांनी आज येथील कांताई सभागृहात केले.
            नेहरु युवा केंद्रा तर्फे आयोजित ‘संकल्प से सिध्दी’  कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमात ते  बोलत होते. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी जळगावचे खासदार ए. टी. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय काराळे, राज्य समन्वय समितीचे सदस्य सुनिल बढे, कॅ निलेश गायकवाड, ईश्वर मानखेडकर, फारुख शेख, सुनिल सुर्यवंशी. सौ. कुमुद ककोणीय, आदि उपस्थित होते.
            श्री निंबाळकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, स्वामी विवेकानंद, डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केले असून त्यासाठी संकल्प से सिध्दी हे अभियान हाती घेतले आहे.
             2017 ते 2022 या कालावधीत नव भारत निर्माण करण्यासाठी यूवकांनी यात सहभाग दयावा. माहिती तंत्रज्ञाना च्या युगात नवी नवी तंत्रज्ञान अंगिकारने अत्यावश्यक असले तरी त्याचा अतिरेक होणार नाही याची दक्षता युवकांनी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
             नेहरु युवा केंद्रातून बाहेर पडणारा प्रत्येक तरुण एक आदर्श नागरीक कसा होईल याकडे केंद्र संचालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा. आपल्या आजच्या जीवन शैलीत मोबाईल ही अत्यावश्यक बाब झाल्याने आपआपसातील सुसंवाद कमी झाला आहे. प्रत्येकजण मोबाईलमध्ये गुंतला आहे. पाच हजाराचा मोबाईल सहज खरेदी केला जातो. पण ग्रंथ खरेदी केले जात नाही. त्यामुळे वाचन संस्कृतीचा र्हास झाला आहे. युवकांनी वाचन संस्कृती वृध्दीगंत करण्यासाठी प्रयत्न करावे. असे ही ते शेवटी म्हणाले.
            अभियानानिमित्ताने आयोजित केलेल्या विविध स्पर्धाचे बक्षिस वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. निबंध स्पर्धेत प्रथम स्वाती रामदास पाटील अमळनेर, व्दितीय विजय नारायण पाटील, चोपडा, तृतीय निखिल गोपीचंद पाटील, पाचोरा.
          लघुस्तर स्पर्धेत प्रथम सुश्मिता भालेराव, व्दितीय रुपेश मोहन भाकर, तृतीय गोविंद सुनिल झंवर विजयी ठरले.
           जिल्हा उत्कृष्ट संस्था पुरस्कार 2016 चे मानकरी स्वामी विवेकानंद संस्था, चोपडा 2017 भरारी फांउडेशन जळगाव हे मानकरी ठरले. पुरस्काराचे स्वरूप रु. 25000/- रोख व मानपत्र असे होते.
           प्रारंभी नेहरु युवा केंद्राचे समन्वयक अतुल निकम यांनी प्रास्ताविक करुन प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले.
          कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनोद ढगे यांनी तर आभार प्रदर्शन सौ कुमुद ककोणीया यांनी केले.
०००००

No comments:

Post a Comment