जळगाव,
दि. 19 - सन 2022 पर्यत शेतकऱ्यांचे
उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टपुर्तीसाठी राज्यात 24 मे ते 7 जून, 2018 या रोहिणी
नक्षत्राच्या कालावधीत उन्नत शेती, समृध्द
शेतकरी पंधरवडा राबविण्यात येणार आहे. अशी माहिती आयक्त, कृषि महाराष्ट्र राज्य,
पुणे यांनी दिली आहे.
कृषि
विभागामार्फत शेती विकासाच्या तसेच शेतकरी कल्याणाच्या विविध योजना व कार्यक्रम
राज्यात राबविले जातात. मागील वर्षापासून खरीप व रब्बी हंगामात उन्नत शेती, समृध्द
शेतकरी मोहिम राबविण्यात येत आहे. कृषि विभागाच्या प्रचलित योजनांच्या अमंलबजावणीत
अधिक सुटसुटीतपणा तसेच सुसूत्रता आणुन योजना पारदर्शकरीत्या अधिक प्रभाविपणे
राबविण्याचा शासनाचा उद्देश आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यात रोहिणी नक्षत्रातील
पंधरा दिवस उन्नत शेती, समृध्द शेतकरी हा
तंत्रज्ञान प्रचार व प्रसार पंधरवडा साजरा करुन आधुनिक कृषि तंत्रज्ञान राज्यातील
सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले जाणार आहे.
उन्नत शेती-समृध्द शेतकरी पंधरवडा आयोजनाचे उद्देश :-
§ प्रमुख
पिकांकरीता आधुनिक आणि अद्ययावत कृषि तंत्रज्ञानाचा शेतक-यांपर्यंत प्रसार.
§ शासनाच्या
शेतक-यांसाठी असलेल्या विविध योजना/अभियान/उपक्रम इ.ची माहिती आणि लाभ
घेण्याच्या कार्यपद्धतीबाबत जनजागृती.
§
जमिनीची सुपिकता वाढविण्याच्या दृष्टीने
करावयाच्या उपाययोजनांबाबत शेतक-यांना मार्गदर्शन.
§
बीजप्रक्रियेबाबत प्रात्यक्षिकांचे आयोजन.
§
पीक विमा योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना
सहभागी करुन घेऊन नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानी पासून
शेतकऱ्यांच्या पिकांना विमा संरक्षणाबाबत मार्गदर्शन.
§
प्रचलित योजनेचा लाभ न मिळणाऱ्या तसेच कृषि
तंत्रज्ञान प्रात्यक्षिकामध्ये सहभागी नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रमुख पीकांची
उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान प्रसार.
§
पीक उत्पादनात स्थैर्य राखत उत्पादन खर्च कमी करणे
आणि प्रति थेंब अधिक पीक या संकल्पनांबाबत जनजागृती व मार्गदर्शन.
§
कापसावरील शेंदरी बोंड अळी, भातावरील तपकिरी
तुडतुडे आणि सोयाबीनवरील मोझॅक व पिवळा मोझॅक यांच्या एकात्मिक कीड/रोग
व्यवस्थापनाबाबत जनजागृती व मार्गदर्शन.
§
कापसावरील शेंदरी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी
फेरोमन ट्रॅप (कामगंध सापळे) आणि ट्रायकोकार्डसचे महत्व व वापराबाबत जनजागृती व
मार्गदर्शन.
§
एकात्मिक शेती पद्धती, बहुवार पीक पध्दती तसेच
आंतरपीक पध्दतींबाबत जनजागृती .
§
कृषि संलग्न व कृषि पुरक व्यवसाय जसे पशुपालन,
मधुमक्षिका पालन, मत्स्यशेती, रेशीम उद्योग इत्यादींच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे
निव्वळ आर्थिक उत्पन्न वाढविणेकरीता मार्गदर्शन.
§
प्रगतीशील शेतकऱ्यांनी उच्चतम उत्पादन वाढीकरीता
अवलंबलेले नाविन्यपूर्ण कृषि तंत्रज्ञान इतर
शेतकऱ्यांपर्यंत
पोहचवणे.
§
मोबाईल धारक शेतक-यांना मोफत एस.एम.एस. सेवेचा लाभ
व्हावा म्हणून एम-किसान पोर्टलवर शेतक-यांची नोंदणी.
§
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आणि
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये सहभाग वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात
जनजागृती.
§
विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून बचावात्मक
उपाययोजनांबाबत शेतक-यांमध्ये जनजागृती.
§
गट/समुहाच्या माध्यमातून शेतीमालावर प्राथमिक
प्रक्रिया, मुल्यवर्धन व विपणन करणेबाबत जनजागृती.
§
किडनाशके हाताळणी आणि फवारणी करताना घ्यावयाच्या
काळजीबाबत शेतक-यांमध्ये जनजागृती व मार्गदर्शन.
§
विविध कृषि निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाच्या
दक्षतेबाबत शेतक-यांमध्ये जनजागृती करणे.
§
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून तयार
झालेल्या जलसाठ्यांमधील पाण्याच्या संरक्षित सिंचनासाठी वापराबाबत जनजागृती .
सहभाग :-
महाराष्ट्र
शासन, कृषि विभाग, कृषि विद्यापीठ, महसूल विभाग, जिल्हा परिषद कृषि विभाग, पशुसंवर्धन
विभाग, दुग्धविकास विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, रेशिम व मधुमक्षिका विभाग, कृषि
विज्ञान केंद्रे, आदिवासी विकास विभाग, वन विभाग, सहकार विभाग, शेतकरी उत्पादन
कंपन्या, पिकनिहाय उत्पादक संघ, पणन विभाग, राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँका यांचा
यात सहभाग राहणार आहे.
कार्यपद्धती :-
गावस्तरावरील कार्यक्रम प्रभावी होण्यासाठी तालुक्यातील
प्रगतशील शेतकरी/ कृषि पुरस्कार प्राप्त/पीकस्पर्धा विजेते शेतकरी यांमधून काही
शेतक-यांची निवड करुन त्यांना प्रेरित करणेसाठी तालुकास्तरावर एकदिवशीय
कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेद्वारे प्रेरित शेतक-यांच्या
मार्गदर्शनाचा लाभ गावपातळीवरील कार्यक्रमांमधून इतर शेतकऱ्यांना मिळवून देण्यात
येणार आहे.
गावामधील कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता गावातील सरपंच,
ग्रामपंचायत सदस्य, कृषि विज्ञान मंडळ, सर्व शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या,
कृषि विज्ञान केंद्रे, गावाशी संबंधित राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँक शाखा, आत्मा
समितीतील सदस्य, इतर कृषि संलग्न विभागाचे ग्रामस्तरीय कर्मचारी/अधिकारी यांचेशी
समन्वय साधून उपरोक्त उद्देशपूर्तीसाठी पंधरवडा दरम्यान विविध कार्यक्रम/
चर्चासत्रे/ बैठका/कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी सर्व शेतकरी
बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे कृषि विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.
000
No comments:
Post a Comment