·
आधारकार्ड नोंदणी न झालेल्या
लाभार्थ्यांसाठी तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील असणार रुट ऑफिसर नॉमिनी
जळगाव, दि. 14 - जिल्ह्यात संपूर्ण संगणकीकरण प्रकल्पांतर्गत सार्वजनिक वितरण
व्यवस्थेत संगणकीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत सर्व रास्तभाव
दुकानात ई पॉस मशिन बसविण्यात आल्या असून त्याव्दारे पात्र लाभार्थ्यांची
बायोमेट्रिक ओळख पटविल्यानंतरच शिधावस्तूचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती
जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
मे २०१८ पासुन जळगाव जिल्ह्यात आधार
इनाबल्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम (AePDS) सुरु करण्यात आली आहे. या पध्दतीची
माहिती देण्याकरीता श्री. जाधव यांच्या दालनात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात
आले होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींना या पध्दतीची माहिती देतांना श्री. जाधव पुढे
म्हणाले की, जिल्ह्यातील १९२८ पैकी १९२१ स्वस्त धान्य दुकानातील पात्र
लाभार्थ्याच्या १ लाख ३७ हजार ५४३ शिधापत्रिकांपैकी १ लाख ३७ हजार १७४
शिधापत्रिकांची आधार जोडणी करण्यात आली आहे. यामध्ये भडगाव, जळगाव, मुक्ताईनगर,
यावल, धरणगाव व पाचोरा या तालुक्यात १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर इतर तालुक्यातील फक्त ३६८ कार्डधारकांचे आधार
जोडणी बाकी असल्याची माहितीही श्री. जाधव यांनी यावेळी दिली. या प्रणालीत रास्तभाव
दुकानातील ई पॉस मशिनव्दारे कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचे Aadhar
Authentication झाले तरी धान्य वितरीत
करण्यात येणार आहे.
तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील असणार रुट ऑफिसर नॉमिनी
लाभार्थ्याचे Aadhar Authentication नाही झाले तर eKYC (e-Know Your Customer) करुन धान्य वितरण करण्यात येईल. Aadhar Seeding नसलेल्या सदस्यांचे
eKYC करुन धान्य वितरण केले जाईल. ज्या लाभार्थ्यांच्या बाबतीत हे तीनही पर्याय
शक्य होणार नाही त्यांचेसाठी गावातील तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांना Route
Officer Nominee म्हणून नेमण्यात आले असून त्यांच्या Aadhar Authentication च्या
आधारे धान्य वितरण केले जाणार आहे.
३१ मे रोजी होणार जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकांनाची तपासणी
या प्रणालीचा वापर करुन जिल्ह्यातील
कोणत्या स्वस्त धान्य दुकानदाराने वाटपासाठी किती धान्य नेले, किती धान्याचे वाटप
केले व किती धान्य शिल्लक राहिले. याची तपासणी संपूर्ण जिल्ह्यात एकाचदिवशी म्हणजे
३१ मे रोजी महसुल विभागाच्यावतीने करण्यात येणार असल्याचेही श्री. जाधव यांनी
यावेळी सांगितले.
या प्रणालीमुळे स्वस्त धान्य वाटपात
पारदर्शीपणा येणार असून बोगस लाभार्थी तसेच धान्याचा काळाबाजार रोखण्यास मोठया
प्रमाणात मदत होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. जाधव यांनी दिली.
000
No comments:
Post a Comment