जळगाव, दि. 1 - तुफान आलं या… महाश्रमदानाच तुफान आलं या.. असे दृश्य आज पारोळा तालुक्यातील टेहू या गांवी बघावयास मिळाले. निमित्त होते अभिनेता अमीर खानच्या पानी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावामध्ये 1 मे या महाराष्ट्र दिनी महाश्रमदान करण्याचे.
पानी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत प्रथमच जळगाव जिल्ह्यातील पारोळा व अमळनेर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत पारोळा तालुक्यातील 49 व अमळनेर तालुक्यातील 50 अशी एकूण 99 गावे सहभागी झाली असून ही स्पर्धा 8 एप्रिल ते 22 मे 2018 या कालावधीत होणार आहे. जिल्ह्यात या स्पर्धेला 8 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता नगाव येथे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी स्वत: श्रमदान करुन सुरुवात केली. त्याचबरोबर 22 एप्रिल रोजी कळमसरे व जवखेडा या गावांमध्ये जाऊन श्रमदान केले आणि गावकऱ्यांचा उत्साह वाढविला. आणि तेव्हापासून जिल्ह्यातील या गावांमध्ये श्रमदानाची स्पर्धाच लागली आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत भटकळ हे 23 एप्रिल रोजी जळगावात आले असता त्यांनी 1 मे या महाराष्ट्र दिनी महाश्रमदान करण्यात येणार असून यामध्ये सर्व नागरीकांनी सामील होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला त्वरीत प्रतिसाद देऊन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी या दिवशी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी एका गावात जाऊन श्रमदान करतील असे घोषित केले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील टेहू हे गाव सहभागी झाले असून या गावात मोठ्या प्रमाणात श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे सुरु असल्याने सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी महाश्रमदानासाठी याच गावाची निवड केली.
महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्या नेतृत्वाखाली दुपारी चार वाजता सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी टेहू येथे पोहोचण्याचे निश्चित झाले. त्यानुसार सर्व अधिकारी दुपारी चारच्या ठोक्याला टेहू येथे पोहोचले. यामध्ये आघाडीवर असलेले जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर हे सपत्निक, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, फैजपूरचे प्रांताधिकारी शर्मा, उप जिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, तहसीलदार अमोल निकम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, जिल्हा विकास कृषि अधिकारी मधुकर चौधरी, पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विलास सोनवणे, गटविकास अधिकारी यांच्यासह महसुल, पोलीस, जिल्हा परिषद, कृषि विभागाचे तालुकास्तरीय शेकडो अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वत: कुदळ व फावडे घेऊन चर खणण्याच्या व माती उचलण्याच्या श्रमदानाला सुरुवात केली. ग्रामस्थांसह परिसरातील कार्यकर्ते व नागरिक, महिला, आबालवृद्ध सगळेच श्रमदानाच्या कार्यात सहभागी झाले होते. ‘जल है तो कल है’, ‘दुष्काळाशी दोन हात’ अशा घोषणा सर्व श्रमदान करणारे देत होते. दिवसभरात या गावात हजारो नागरीकांनी समरसून श्रमदान केले. व गावातील शेतजमीनीवर सकाळ व सांयकाळच्या वेळेत 6 मीटर बाय 1 मीटर अंतराचे 66 बांध बंदिस्तीचे काम केले. या महाश्रमदान मोहिमेत सकाळी खासदार ए. टी. नाना पाटील यांनी तर सांयकाळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वलाताई पाटील यांचेसह गावचे सरपंच, पोलीस पाटील, ॲङ मोरे पानी फाऊंडेशनचे श्री. राणे, स्वयंसेवक, गावातील अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, गावकरी मंडळी, आबालवृध्द आदींनी महाश्रमदान केले.
पानी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत प्रथमच जळगाव जिल्ह्यातील पारोळा व अमळनेर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत पारोळा तालुक्यातील 49 व अमळनेर तालुक्यातील 50 अशी एकूण 99 गावे सहभागी झाली असून ही स्पर्धा 8 एप्रिल ते 22 मे 2018 या कालावधीत होणार आहे. जिल्ह्यात या स्पर्धेला 8 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता नगाव येथे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी स्वत: श्रमदान करुन सुरुवात केली. त्याचबरोबर 22 एप्रिल रोजी कळमसरे व जवखेडा या गावांमध्ये जाऊन श्रमदान केले आणि गावकऱ्यांचा उत्साह वाढविला. आणि तेव्हापासून जिल्ह्यातील या गावांमध्ये श्रमदानाची स्पर्धाच लागली आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत भटकळ हे 23 एप्रिल रोजी जळगावात आले असता त्यांनी 1 मे या महाराष्ट्र दिनी महाश्रमदान करण्यात येणार असून यामध्ये सर्व नागरीकांनी सामील होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला त्वरीत प्रतिसाद देऊन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी या दिवशी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी एका गावात जाऊन श्रमदान करतील असे घोषित केले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील टेहू हे गाव सहभागी झाले असून या गावात मोठ्या प्रमाणात श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे सुरु असल्याने सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी महाश्रमदानासाठी याच गावाची निवड केली.
महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्या नेतृत्वाखाली दुपारी चार वाजता सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी टेहू येथे पोहोचण्याचे निश्चित झाले. त्यानुसार सर्व अधिकारी दुपारी चारच्या ठोक्याला टेहू येथे पोहोचले. यामध्ये आघाडीवर असलेले जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर हे सपत्निक, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, फैजपूरचे प्रांताधिकारी शर्मा, उप जिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, तहसीलदार अमोल निकम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, जिल्हा विकास कृषि अधिकारी मधुकर चौधरी, पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विलास सोनवणे, गटविकास अधिकारी यांच्यासह महसुल, पोलीस, जिल्हा परिषद, कृषि विभागाचे तालुकास्तरीय शेकडो अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वत: कुदळ व फावडे घेऊन चर खणण्याच्या व माती उचलण्याच्या श्रमदानाला सुरुवात केली. ग्रामस्थांसह परिसरातील कार्यकर्ते व नागरिक, महिला, आबालवृद्ध सगळेच श्रमदानाच्या कार्यात सहभागी झाले होते. ‘जल है तो कल है’, ‘दुष्काळाशी दोन हात’ अशा घोषणा सर्व श्रमदान करणारे देत होते. दिवसभरात या गावात हजारो नागरीकांनी समरसून श्रमदान केले. व गावातील शेतजमीनीवर सकाळ व सांयकाळच्या वेळेत 6 मीटर बाय 1 मीटर अंतराचे 66 बांध बंदिस्तीचे काम केले. या महाश्रमदान मोहिमेत सकाळी खासदार ए. टी. नाना पाटील यांनी तर सांयकाळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वलाताई पाटील यांचेसह गावचे सरपंच, पोलीस पाटील, ॲङ मोरे पानी फाऊंडेशनचे श्री. राणे, स्वयंसेवक, गावातील अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, गावकरी मंडळी, आबालवृध्द आदींनी महाश्रमदान केले.
विलास बोडके,
जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव
000
No comments:
Post a Comment