यावेळी
प्रशिक्षण सत्रास मार्गदर्शन करतांना श्री. गाडीलकर म्हणाले की, सर्व विक्रेते,
कंपनी प्रतिनिधी यांनी व शासकीय अधिकारी यांनी समन्वयाने कामकाज करुन खरीप हंगामात
कोणताही अनुचित प्रकार, बोगस निविष्ठांची विक्री होणार नाही यांची दक्षता घ्यावी.
बोगस निविष्ठांची विक्री किंवा जादा दराने विक्री करीत असल्याचे आढल्यास कृषी,
महसुल व पोलीस विभागामार्फत कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी असे त्यांनी
सुचित केले.
या
प्रशिक्षणास प्रमुख मार्गदर्शक- मोहिम अधिकारी पी.एस.महाजन, जिल्हा गुणवंत्ता नियंत्रण
निरीक्षक अमित पाटील, कृषी अधिकारी डी. एम. शिंपी, सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲङ
निखिल कुलकर्णी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुनिल कुऱ्हाडे यांनी बियाणे,
खते व किटकनाशके कायद्याबाबत मार्गदर्शन केले. विभागीय व्यवस्थापक महिको सुभाष
थेटे यांनी बोंडअळीचे व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.
या
कार्यक्रमास जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी, कृषी
अधिकारी (गुणनियंत्रण) पंचायत समिती, मंडळ कृषी अधिकारी, वजन मापे निरीक्षक, अनंत
पाटील, घाऊक व किरकोळ विक्रेते, बियाणे, खते, किटकनाशक कंपनीचे जिल्हास्तर
प्रतिनिधी, बियाणे, खते किटकनाशक असोसिएशन राज्य उपाध्यक्ष कैलास मालु व प्रमोद
पाटील, सदस्य हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची
प्रस्तावना कृषी उपसंचालक अनिल भोकरे व सुत्रसंचालन मोहिम अधिकारी पी. एस. महाजन
यांनी केले. .
000000
No comments:
Post a Comment