जळगाव, दि. 28 - केंद्र शासनाने
खरिप हंगाम 2018 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना दि. ओरिएन्टल इंन्शुरन्स
कंपनी लि. पुणे यांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यात
राबविण्याचा निर्णय घेतला असून या योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत 31 जुलै, 2018
पर्यंत आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली आहे.
अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिके
घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणा-या शेतक-यांसह) सर्व शेतकरी या योजनेत
भाग घेण्यास पात्र असून ही योजना खरिप हंगाम 2018 मध्ये राबविण्यात येत आहे. शेतक-यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरिप
हंगामासाठी 2 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. योजनेंतर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित
रक्क्म व शेतक-यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता यांचा तपशील. (पीक, विमा संरक्षित रक्कम रुपये, (शेतकरी
हिस्सा प्रति हे.)) खरीप ज्वारी - 24 हजार रुपये (480) बाजरी -20 हजार रुपये (400) सोयाबीन -36 हजार रुपये (720) भुईमुग - 31 हजार 500 रुपये (630) तीळ-
22 हजार रुपये (440), मुग व उडीद-18 हजार 900 रुपये (378), तुर - 25 हजार रुपये (500),
कापुस-36 हजार रुपये (1800) मका -26 हजार 200 रुपये (524) असा आहे.
अधिक
माहितीसाठी आपल्या तालुक्यातील नजीकची जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा, सर्व
राष्ट्रीयकृत बँक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय (सर्व तालुका), उपविभागीय कृषि
अधिकारी, जळगाव/पाचोरा/अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव आकाशवाणी
शेजारी, प्रशासकीय ईमारत दुरध्वनी क्र. 0257-2239054/0257-2236708, दि. ओरिएन्टल
इंन्शुरन्स कंपनी लि. पुणे टोल फ्री क्रं. 1800118485 व दुरध्वनी क्र 020-41202252
यांचेशी या क्रमाकांवर संपर्क साधावा.
नैसर्गिक
आपत्तीपासून नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त
शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे विवेक सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव
यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment