Tuesday, 13 November 2018

पौष्टीक तृणधान्य दिनानिमित्ताने 16 नोव्हेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन

       जळगाव, दि. 13 - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2018-19 अंतर्गत पौष्टिक तृणधान्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या व्यापक जनजागृतीसाठी शुक्रवार, दिनांक 16 नोव्हेंबर, 2018 रोजी राजर्षी शाहु महाराज सभागृह, जिल्हा परिषद, जळगाव येथे सकाळी 10 वाजता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती सदस्य सचिव, जिल्हा अभियान समिती तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
     राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2018-19 अंतर्गत पौष्टिक तृणधान्ये ज्वारी, बाजरी पिकांचे प्रामुख्याने क्षेत्र व उत्पादकता वाढविण्यासाठी पौष्टिक तृणधान्य अभियान राबविण्यात येत आहे. तसेच सन 2018-19 व 2019-20 ही राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे म्हणून केंद्र शासनाने जाहीर केली आहेत. त्या अनुषंगाने पौष्टिक तृणधान्यांचे उत्पादन व स्वास्थ्य आहाराचे महत्व याबाबत व्यापक जनजागृतीच्या दृष्टिने दिनांक 16 नोव्हेंबर, 2018 रोजी पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्ताने कृषि महाविद्यालय, आहारतज्ञ, सामाजिक न्याय विभाग, शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, महिला व बाल विकास, आरोग्य विभाग, कृषि अधिकारी, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने व्यापक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तरी या कार्यशाळेस शेतकरी, नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे. 
                                                                ०००

No comments:

Post a Comment