जळगाव,
दि.17 - वाघूर धरण विभाग, जळगाव अंतर्गत
वाघूर प्रकल्पावरील उजवा व डावा कालव्याव्दारे कालवा प्रवाही, कालवा उपसा, जलाशय
उपसा, लाभक्षेत्रातील अधिसुचित नदी, नाले, ओढे यावरुन उपसा सिंचनाने तसेच
लाभक्षेत्रातील व 35 मीटर आतील विहिरीवरुन पाण्याचा लाभ घेणा-या सर्व लाभधारकांना
कळविण्यात येत आहे. यावर्षी वाघूर प्रकल्पात सिंचनासाठी पाणीसाठा उपलब्ध झालेला
असून पिण्याचे पाण्याचे आरक्षण वगळून उर्वरीत उपलब्ध पाणीसाठयानुसार रब्बी हंगाम
2018-19 मध्ये दि. 16 नोव्हेबर ते 5 डिसेंबर, 2018 या मुदतीत रब्बी कपाशी, मका, कडवाळ, सुर्यफुल, भाजीपाला,
विहिरीवरील उभे पिके इ. हंगामी सिंचनासाठी
पाणी पुरवठा करण्याचे ठरविण्यात आलेले आहे.
नमूना
नं. 7 व 7 अ 7 ब चे पाणीअर्जावर मागणी
करुन पाणी अर्ज दिनांक 20 नोव्हेबर, 2018 च्या आत संबंधीत उपविभागीय
कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अगर पोस्टाने देण्याचे करावे. पुरेशी पाणी
मागणी अर्ज प्राप्त झाल्याशिवाय आवर्तन सोडण्यात येणार नाही. असे कार्यकारी
अभियंता वाघूर धरण विभाग जळगाव यांनी कळविले आहे.
सिंचनाच्या
पाणीपुरवठ्यासाठी खालील अटी व शर्ती राहतील.
प्रत्येक चारीच्या मुखाजवळच्या क्षेत्रासच मंजूरी देण्यात
येईल. उडाप्याचे व चारीच्या अथवा कालव्याच्या पुच्छ भागांतील क्षेत्रास मंजुरी
देण्यात येणार नाही. प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रास मंजुरी दिली जाईल. प्रत्यक्ष
पास मिळाल्या शिवाय मंजूरी मिळाली असे समजू नये. पाणी अर्जाचा निर्णय संबंधित
ग्रामपंचायतीत नोटीस बोर्डावर जाहीर केला जाईल. मंजुरी क्षेत्रावर मंजुर पिकासच
पाणी घ्यावे लागेल. पाणी अर्ज देतांना 7/12 उतारा अथवा खाते पुस्तीका संबंधीत उपविभागात
दाखवावी लागेल. पाणी अर्ज स्विकारणेची मुदत दिनांक 20 नोव्हेंबर 2018 नंतर वाढविली
जाणार नाही. मुदती नंतर आलेल्या पाणी अर्जावर सव्वापट पाणीपट्टी आकारली जाईल. पाणी
टंचाईमुळे पिण्याचे पाण्याचे आरक्षण अथवा काही अपरिहार्य कारणास्तव मंजुरी पिकास
पाणी पुरवठा न करता आल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्यास हे खाते जबाबदार
रहाणार नाही. रब्बी हंगाम व उन्हाळी हंगाम 2017-18 व त्या अगोदरची थकबाकी भरावी
लागेल. असे प्र. पां. वराडे, कार्यकारी अभियंता, वाघूर धरण विभाग, जळगाव यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment