जळगाव, दि. 15 - जिल्हाधिकारी
कार्यालय, कृषि विभाग व इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने
विषमुक्त शेती आणि निरोगी भारत या विषयावर राजे छत्रपती संभाजी नाट्यगृह येथे रविवार
दिनांक 18 नोव्हेंबर, 2018 रोजी दुपारी 3.00 वाजता भारत विकास ग्रुप चेअरमन
हणुमंतराव गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
नागरीकांचे
आरोग्य चांगले रहावे यासाठी त्यांना विषमुक्त अन्न मिळणे आवश्यक आहे. याकरीता
शेतीत रासायनिक खते व अवास्तव किटकनाशकांचा वापर न करताही शेती करता येते. याबाबत
या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खते व
किटकनाशकांचा वापर न करता अन्न पिकविल्यास नागरीकांना विषमुक्त अन्न मिळेल.
जेणेकरुन निरोगी भारत निर्माण होण्यास मदत होईल. याकरीता जिल्हा प्रशासनाच्यावतीने
या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या
व्याख्यानास जिल्ह्यातील शेतकरी, टेसेस गार्डन व परसबागेत शेती करणारे नागरीक,
शेतीशी निगडीत विविध संस्था, सामाजिक व वैद्यकिय क्षेत्रात काम करणारे, कृषि
क्षेत्राचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांनी मोठया संख्येने उपस्थित राहवे. असे
आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment