जळगाव, दि. 26 - राज्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे 151 तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ घोषित केला आहे. दुष्काळी सदृश्य परिस्थितीमध्ये संभाव्य चारा टंचाई विचारात घेता चारा पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी जलसंपदा तसेच मृद जलसंधारण विभागाच्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा कमी झाल्यामुळे बुडीता खालील जमिनी मोकळ्या/उघड्या झालेल्या आहेत. अशा गाळपेरा क्षेत्रांवर चारा पिकांचे उत्पादन करुन जनावरांसाठी चारा उत्पादन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
त्यास अनुसरुन जळगाव जिल्ह्यातून गाळपेरा क्षेत्रात चारा लागवड करण्यासाठी पात्र व ईच्छुक लाभार्थ्यांनी 4 डिसेंबर, 2018 पर्यत विहीत नमुन्यात अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांचेमार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व अर्जाचा विहित नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती, पशुवैधकीय दवाखाना यांचेशी संपर्क साधावा, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००
त्यास अनुसरुन जळगाव जिल्ह्यातून गाळपेरा क्षेत्रात चारा लागवड करण्यासाठी पात्र व ईच्छुक लाभार्थ्यांनी 4 डिसेंबर, 2018 पर्यत विहीत नमुन्यात अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांचेमार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व अर्जाचा विहित नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती, पशुवैधकीय दवाखाना यांचेशी संपर्क साधावा, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment