सद्यस्थितीत कपाशीचे पीक बोंडे पक्वता व वेचणीच्या अवस्थेत आहे. गुलाबी
बोंड अळीच्या वाढीसाठी दिवसाचे तापमान 290 ते
320 सें. व रात्रीचे तापमान
110 ते 14 0 सें.
तर दिवसाची आर्दता 71 ते 80 टक्के तर रात्रीची आर्दता 26 ते 35 टक्के अत्यंत पोषक आहे. यावर्षी सप्टेंबरच्या
शेवटच्या आठवडयापासुन
ते आक्टोबरच्या तिस-या आठवडयापर्यंत सरासरी दिवसाचे तापमान 350 सें. असल्यामुळे या अळीचा प्रादुर्भाव
वाढण्यास अटकाव झाला होता. परंतु आता यापुढे तापमान जसे
जसे कमी होत जाईल व हे तापमान वरील तापमानाच्या श्रेणीमधे (टप्यामधे) येईल तशी गुलाबी बोंडअळीच्या
प्रादुर्भावात वाढ होईल.
गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी नियमित सर्वेक्षण करून फेरोमोन
सापळयामधील पतंग दर आठवडयाने मोजून नष्ट करावे. शेतामधे
लावलेल्या सापळयामधील कामगंध वडया (ल्युर) वेस्टनावरील सुचनेनुसार बदलाव्यात व प्रत्येक शेतकरी बंधुनी एकरी कमीत कमी
आठ फेरामोन सापळे लावून सापाळ्यात अडकलेले पतंग नष्ट करण्याची मोहीम राबवावी.
तसेच प्रत्येक आठवडयाला एकरी शेताचे प्रतिनीधीत्व करतील अशी 20 झाडे निवडावीत, निवडलेल्या झाडावरील मध्यम
आकाराचे, मध्यम पक्व झालेले व बाहेरून किडके नसलेले एक
बोंड अशी 20 बोंडे तोडून त्यामधील जीवंत अळयांची संख्या
मोजून, त्यामध्ये जर दोन किडकी बोंडे किंवा दोन पांढरी/
गुलाबी रंग धारण करीत असलेल्या अळया आढळल्यास आर्थिक नुकसान
पातळी ओलांडली असे समजून झाडावर पुरेशी हिरवी बोंडे असल्यासच शेतकरी बंधूनी
खालीलप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी व आवशकता भासल्यास परत 12 ते 15 दिवसाचे अतंराने (आर्थिक नुकसान संकेत पातळीवर आधारित) दुसरी
फवारणी करावी. प्रत्येक फवारणीमधे वेगवेगळे रासायनिक
किटकनाशके वापरावे.
सदयस्थितीत बागाईत कपाशीवर प्रादुर्भावास नुकतीच सुरूवात झालेल्या
क्षेत्रावर ट्रायझोफॉस 40 टक्के प्रवाही 30 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के प्रवाही
10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी.
जेथे प्रादुर्भाव 10 टक्क्याच्या वर आहे अशा
ठिकाणी मिश्र किटकनाशकांची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. त्यामधे ट्रायझाफॉस 35 टक्के
+ डेल्टामेथ्रीन 1 टक्के 17 मिली
किंवा क्लोरेट्रेनिलीप्रोल 9.3 टक्के +
लॅंब्डासायहॅलोथी्रन 4.6 टक्के 5 मिली किंवा इंडॉक्झीकार्ब 14.5 टक्के +
अॅसीटामाप्रीड 7.7 टक्के 10 मिली
किंवा क्लोरोपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली.
कोरडवाहू पिकाची
स्थिती, पाण्याचा ताण व पिकाचा उर्वरित कालावधी लक्षात
घेवुनच फवारणीचा निर्णय घ्यावयाचा आहे. जेथे ओलीताची सोय
आहे त्यांनी हलके पाणी देऊनच फवारणी करावी. फवारणी
करणेपुर्वी उमललेल्या बोंडातील कापूस वेचूनच फवारणी करावी. शेतकरी बंधुनी कोणत्याही परिस्थितीत कपाशीची फरदड घेऊ नये. सर्वसाधारण तीन ते चार वेचण्या झाल्याबरोबर कपाशीचे पीक काढून टाकावे.
कापुस साठवणुक व संकलन केंद्रे, जिनींग मिल्स
ई. ठिकाणी सुध्दा कापूस यावयास सुरूवात झाली आहे. तिथे आतापासुनच साफ सफाई मोहीम राबवुन परिसरामधील कापूस जिनींग नंतर
चाळणीवरच्या अळया, कोश व खराब कापूस ई. ची वेळोवळी त्वरीत विल्हेवाट लावावी व त्या परिसरात प्रत्येकी
15 ते 20 फेरोमोन सापळे लावावेत तसेच
प्रकाश सापळेद्वारे अडकलेले पतंग वेळोवेळी नष्ट करणे गरजेचे आहे.
000
No comments:
Post a Comment