जळगाव, दि. 2 - जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात
घेता येत्या तीन दिवसात गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आर्वतन सोडण्यात येणार
असल्याची माहिती राज्याचे महसुल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थतीची पाहणी
करण्यासाठी पालकमंत्री ना. पाटील यांनी आज चाळीसगाव तालुक्यातील खरजाई, तरवाडे,
भडगाव तालुक्यातील तांदलवाडी, पाचोरा तालुक्यातील हडसन, सामनेर, जळगाव तालुक्यातील
वडली, वावडदा या गावांना भेटी देऊन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच परिसरातील
पीक परिस्थिती व दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री ना. पाटील यांनी चाळीसगाव
तालुक्यातील खरजाई, तरवाडे या गावास भेट दिली असता या गावातील एकाच विहिरीवर इतर
दोन गावांची पाणीपुरवठा योजना आहे. त्यामुळे गावास पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत
असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले असता भविष्यातील पाणी पाण्याची टंचाई लक्षात घेता
प्रत्येक गावासाठी स्वतंत्र विहीर/बुडक्या घेण्याची सुचना त्यांनी यंत्रणेला दिली.
कपाशीवरील बोंडअळीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे
मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने आतापर्यंत 3
हजार 300 कोटी रूपयांची नुकसान भरपाई जाहिर केली. या नुकसान भरपाईचा 640 कोटी
रुपयांचा शेवटचा हप्ता राज्य शासनाने कालच जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला असल्याची
माहिती त्यांनी तरवाडे येथे दिली.
जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची
टंचाई भासू नये यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ते नियोजन करण्यात येत असल्याचे
त्यांनी सांगितले. तसेच जनावरांना पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची टंचाई होवू नये
यासाठी जिल्ह्यात मोफत वैरण बियाणे उपलब्ध करुन देत असून ज्या भागात पाण्याची
उपलब्धता आहे. तेथील शेतकऱ्यांनी चाऱ्याचे पीक घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी
केले. भविष्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे
आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात
येत असलेल्या ठिकाणी लोडशेडींग करण्यात येवू नये अथवा लोडशेडींगची वेळ बदलण्यासाठी
आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येईल. असेही
त्यांनी वडली येथील शेतकऱ्यांनी
याबाबत अडचणी मांडल्यानंतर सांगितले.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत हाताळण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या
खंबीरपणे पाठीशी असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी वावडदा शिवारातील शेतकऱ्यांशी
संवाद साधताना दिली.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात 4 हजार
क्विंटल हरभरा बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येत असून याचा शुभारंभ आज
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते
हडसन ता. पाचोरा येथील शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करुन
शेतकऱ्यांना करण्यात आले.
यावेळी पालकमंत्र्यासमवेत या पाहणी
दौऱ्यात आमदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे
शिक्षण व कृषी सभापती पोपटतात्या भोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक
अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, उपसंचालक कृषी
अनिल भोकरे यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील खरजाई, तरवाडे येथे चाळीसगावचे उप
विभागीय अधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे
अभियंता एन. सी. पाटील, भडगाव तालुक्यातील तांदलवाडी येथे पाचोऱ्याचे उप विभागीय
अधिकारी राजेंद्र कचरे, भडगाव तालुक्याचे तहसिलदार सी. एम. वाघ, पंचायत समितीचे
गटविकास अधिकारी श्रीमती दिपाली कोतवाल, पाचोरा तालुक्यातील हडसण, सामनेर येथे
तहसिलदार बी. ए. कापसे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश चौधरी, जळगाव
तालुक्यातील वडली, वावडदा येथे जळगावचे उप विभागीय अधिकारी जितेंद्र पाटील,
तहसिलदार अमोल निकम यांचेसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment