जळगाव, दि.7- राज्यात 13 कोटी वृक्ष
लागवड कार्यक्रम 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत राबविण्यात येणार असून जिल्हयातील
42 लक्ष 43 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून 6 जून 18 पर्यंत 42 लक्ष 93 हजार
517 वृक्ष लागवडीसाठी खड्डे तयार करण्यात आले असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी श्री.
गोरक्ष गाडीलकर यांनी आज पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीना दिली.
यावेळी जळगाव उपवनसंरक्षक श्री. पी. डब्ल्यु पगार, यावल उपवनसंरक्षक श्री. संजय
दहिवले, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक श्री सुरेद्र वाढाई, रोहयो
उपजिल्हाधिकारी श्री. जितेंद्र पाटील, जिल्हा समन्वयक श्री. उदय एन सोनवणे उपस्थित
होते.
श्री.
गाडीलकर पुढे म्हणाले वृक्षलागवड ही लोकचळवळ व्हावी यासाठी समाजातील सर्व घटकांना
13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी केले गेले जिल्हयातील सर्व स्वयंसेवी
संस्थांना वृक्षलागवडीसाठी संदर्भात जन प्रबोधन करावे, वृक्ष लागवडी बरोबरच वृक्ष
संवर्धन ही महत्वाचे असल्याने झाडांना पाणी देणे, चाराई बंदी, कु-हाड बंदी आदि
उपाय योजना बाबत समाज जागृती करावी. स्थानिक लोकांचा सहभाग वाढवून वृक्ष लागवड ही
शासनाची मोहिम न राहता मोठी लोकचळवळ उभी राहावी असेही ते म्हणाले वन विभागास 21
लक्ष 50 हजार उद्दिष्ट असून त्यांनी 22 लक्ष 91 हजार 187 साध्य केले आहे. सामाजिक वन
विभागास 6 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून त्या पोटी त्यांना 3 लक्ष 99 हजार 76
पूर्ण केले आहे. जिल्हयातील ग्राम पंचायतीना 12 लक्ष 54 हजार 650 उद्दिष्ट असून
त्यापैकी 12 लक्ष 90 हजार 328 उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जिल्हयात 42
रोपवाटीकांनामधून 65 लक्ष 31 हजार रोपांचे निर्मिती केली असून यात 16 लक्ष 36 हजार
उंच रोपांची संख्या असून 48 लक्ष 95 हजार लहान रोप आहेत.
यात
बाबू, निंब, खैर, शिवण, शिसू, काशीद, मोहा, करंज, महारुख, साग, अंजन,
रेनट्री, वड, पिंपळ, शिरस इ.या वृक्ष प्रजाती असून चिंच, जांभुळ, आवळा, कवीठ, सिताफळ, विलायती
चिंच, भोकर, आंबा इ.फळ झाडे आहेत.
जिल्हयातील
1150 ग्रामपंचायतीना प्रत्येकी 1125 प्रमाण एकूण 12 लक्ष 93 हजार 750 रोप लावण्यात
येणार आहेत. वन विभागामार्फत ग्रामपंचायतीना मोफत उंच रोपे पुरविण्यात येणार आहेत.
श्रमदानाने
वृक्ष लावगड करण्यात येणार आहे. मॅगॅसेसे पुरस्कार प्राप्त निलिमा मिश्रा यांच्या
कडून 10 हेक्टर क्षेत्रावर श्रमदानाव्दारे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. विवेकानंद
प्रतिष्ठान या संस्थेव्दारे विद्यार्थी व पालक यांच्याव्दारे रोपण आहे.
पाणी
फाऊंडेशन मार्फत रोपवाटीका तयार करुन रोपांचे
मोफत वाटप करण्यात येणार आहे.
वनविभागामार्फत
वनसंरक्षण समित्या वनालगतच्या सर्व गावात स्थापन केल्या असून त्यांच्याव्दारे रोपे
जगावीत म्हणून जनजागृती केली जाते. चराईबंदी व कुऱ्हाडबंदीवर विशेष भर दिला जाणार
आहे.
ग्रीन आर्मी सदस्य नोंदणी वाढविण्यासाठी
प्रसार माध्यमांनी प्रसिध्दी करावी असेही
ते शेवटी म्हणाले या मोहिमेत सर्वानी
सहभाग नोंदवून मोहिम यशस्वी करावी.
2 कोटी व 4 कोटी वृक्ष लागवडी जिवत रोपाची
टक्केवारी
सन
2016 जळगाव जिल्हयासाठी 1275000 देण्यात आले होते. त्यापैकी 1369169 एवढे साध्य
झाले. ऑक्टोबर 2017 मधील जिवत रोपांची टक्केवारी 77.18 एवढी आहे. 2017 जळगाव जिल्हयासाठी 2089049 देण्यात आले
होते. त्यापैकी 2252545 एवढे साध्य झाले. ऑक्टोबर 2017 मधील जिवत रोपांची
टक्केवारी 89.12 एवढी आहे.
०००
No comments:
Post a Comment