जळगाव,दि.2:- जळगाव जिल्हयात व संपुर्ण
देशात मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु असून या काळात मोठया संख्येने
मुस्लीम बांधव नमाज पठण करीत असतात. सदर काळात मशीद मध्ये बाहेर बरीचशी गर्दी जमा
झालेली असते. उपवासाचे पवित्र दिवस हे अत्यंत संवेदनशील असतात, देशभरातील शेतकरी
संपावर जाणार असल्याने तसेच जळगाव जिल्हा हा जातीय दृष्टीने संवेदनशील आहे. या
काळात जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी
राहुल मुंडके यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन
जिल्ह्यात दि.16 जून 2018 पावेतो मनाई आदेश लागू केले आहेत, असे अपर
जिल्हादंडाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
०००००
No comments:
Post a Comment