जळगाव, दि.26 – राजश्री छात्रपती शाहू
महाराजांनी दाखविलेला समतेचा मार्ग आजही समाजास दिशादर्शक असून राज्यशासन त्यांनी
दाखविलेल्या मार्गानुसार विविध
शिष्यवृत्ती, वसतीगृह योजना राबवित असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे
निंबाळकर यांनी आज येथील नियोजन भवनात दिली. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण
कार्यालयातर्फे आयोजित “सामाजिक
न्याय दिन व जागतिक अंमली पदार्थ
विरोधी दिन ” कार्यक्रमाचे
अध्यक्षस्थांनावरुन बोलतांना दिली. यावेळी मंचावर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्री.
खुशाल गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, प्रमुख व्यक्ते
नाटयकर्मी साहित्यीक श्री. शंभू पाटील, जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर,
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उपशिक्षणाधिकारी
विकास पाटील, समाजकल्याण अधिकारी श्री. योगेश पाटीलआदि उपस्थित होते.
श्री. निंबाळकर पुढे म्हणाले की, शाहू
महारांजानी शिक्षणाचे महत्व ओळखून मुलींना मोफत शिक्षणच मिळाले पाहिजे हा कायदा
केला. सामाजिक समता निर्माण करण्यासाठी स्वातंत्रय, समता आणि बंधुता यांचे पालन
केले पाहिजे, या माध्यमातुन आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक समता निर्माण होईल. शाहू
महाराजांनी महात्मा फुले यांची विचारधारा स्वीकारुन सामाजिक समता प्रस्थापित
करण्यासाठी कार्य सुरु केले. मातृभाषेतून शिक्षण दिल्यास चांगले आकलन होते. विद्यार्थ्याना
राहण्यासाठी त्यांनी आपला राजवाडा खुला केला. नोक-यामध्ये 50 टक्के आरक्षण
मागासवर्गासाठी त्यांनी ठेवले, जेणे करुन मागास समाज मुख्यप्रवाहात येवून आर्थिक
विकास होईल असे सांगून शाळेत गैरहजर राहाणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांना तीन रुपये दंड
आकाराची पध्दत त्यांनी सुरु केली. विद्यार्थ्यासाठी वसतीगृहे सुरु केली श्री. शाहू
महाराजांना भारतीय वसतिगृहाचे आदयजनक मानले जाते असे ते शेवटी म्हणाले.
प्रमुख व्याख्याते जेष्ठ नाटयकर्मी व साहित्यीक श्री. शंभू पाटील यांनी राजर्षी छात्रपती शाहु महाराज यांच्या जीवन
कार्यावर आधारीत प्रसंग सांगून सामाजिक समतेची व्याख्या स्पष्ट केली.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर
यांनी उपस्थितांना अंमली पदार्थाविरोधी शपथ दिली. दहावी परिक्षेत शाळेत प्रथम
आलेल्या विद्यार्थ्यांना शाहू महाराज गुणवंत पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. प्रारंभी
मान्यवरांच्या हस्ते शाहू, फुले डॉ. आंबेडकर
यांच्या प्रतिमेचे पुजन करुन दीप प्रज्वलीत करुन कार्यक्रमांचे उदघाटन झाले, दिशा
संस्थेच्या वतीने समतेचा जागर हे गीत सादर करण्यात आले. जिल्हा परिषदेचे समाज
कल्याण अधिकारी श्रीमती अनिता राठोड यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.
समता दिंडीचे आयोजन
सामाजिक
न्याय दिना निमित्ताने येथील शिवतीर्थ येथून आज सकाळी समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीला
जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. यावेळी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण श्री. खुशाल
गायकवाड, समाज कल्याण अधिकारी श्रीमती अनिता राठेाड, समाज कल्याण अधिकारी योगेश
पाटील, उपशिक्षणाधिकारी विकास पाटील, विद्यानिकेतनचे प्राचार्य डी. आर. देवरे,
शिक्षणविस्तार अधिकारी श्री. रविकिरण बि-हाडे, एफ. ए. पठाण, बी.डी धाडी, सौ.
प्रतिमा सुरेश सानप, समाज कल्याण विभागाचे श्री. बोरसे, व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. समता दिंडीत
जिल्हा परिषद विद्यानिकेतन, नंदीनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय, आर.आर. विद्यालय,
अभिनव विद्यालय, ला.ना. विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक सहभागी झाले होते. दिशा
कलापथकांचे कलाकारही सहभागी झाले होते.
०००
No comments:
Post a Comment