जळगाव,
दि. 30 -राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत
जिल्ह्यातील नागरीकांनी मोठया संख्येने सहभागी होऊन ही मोहिम यशस्वी करावी. तसेच
जिल्ह्यास देण्यात आलेले 43 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास हातभार
लावावा. असे आवाहन जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. दिगंबर पगार व यावल
वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. संजय दहिवले यांनी केले आहे.
या
मोहिमेतंर्गत 13 कोटी वृक्ष लागवडीच्या शुभारंभाचा कार्यक्रम एकलग्ऩ, ता. धरणगांव
येथील राखीव वनक्षेत्र 391 (अ), नागपुर-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 येथे 1
जुलै, 2018 रोजी सकाळी 10.00 वा आयोजित करण्यात आला आहे.
या
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून
जिल्ह्यातील सर्व मंत्री महोदय तसेच सर्व लोकसभा सदस्य़, विधान परिषद सदस्य़,
विधानसभा सदस्य़ यांचेसह जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, सर्व शासकीय यंत्रणांचे
प्रमुख यांची उपस्थिती असणार आहे.
50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत सन 2016 मध्ये 1 जुलै,
2016 या एकाच दिवशी महाराष्ट्र राज्यात 2 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट़ ठेवून
जनतेस आवाहन करण्यात आले. त्यास जनतेने भरभरुन प्रतिसाद दिला व महाराष्ट्र राज्यात
1 जुलै, 2016 रोजी एकाच दिवशी 2 कोटी 81 लक्ष रोपे लावून उत्स्फुर्त पाठींबा दिला
व याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली.
जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहून शासनाने पुढील 3 वर्षात 50
कोटी वृक्ष लागवडीची घोषणा केली. त्यानुसार सन 2017 मध्ये 4 कोटी, सन 2018 मध्ये
13 कोटी व सन 2019 मध्ये 33 कोटी असे एकूण 50 कोटी वृक्ष लागवडीची घोषणा करण्यात
आली. त्यानुसार सन 2017 मध्ये 4 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट़ असतांना 5 कोटी 43
लक्ष रोपे लावण्यात आली. सन 2018 मध्ये महाराष्ट्र राज्यात 13 कोटी रोपे लागवडीचे
उद्दिष्ट़ असून जळगांव जिल्हयासाठी 42 लक्ष 43 हजार चा लक्षांक देण्यात आला आहे. जळगांव
जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टापूर्तीसाठी 42.43 लक्ष खड्डे खोदून तयार आहेत.
यावर्षी संपूर्ण जुलै महिन्यात रोपे लागवड करायची आहे. जनतेचा वृक्ष लागवडीचा
उत्साह पाहता जळगांव जिल्ह्यात 45 लक्ष रोपांची लागवड निश्चितपणे केली जाईल.
जळगांव जिल्ह्यासाठी दिलेल्या 42.43 लक्ष वृक्ष लागवडीचे
उद्दिष्ट़ पुर्तीसाठी वन विभाग 62.33 लक्ष उंच रोपांसह रोपे लागवडीसाठी सज्ज़ आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांना वनविभागामार्फत मोफत रोपे पुरविले जाणार आहेत.
तसेच जिल्ह्यातील 1150 ग्रामपंचायतींना 12.94 लक्ष रोपे मोफत वाहतुकीसह पुरविण्यात
येणार आहेत. तसेच शासकीय यंत्रणा श्रमदानाने 3.18 लक्ष रोपे लागवड करण्यासाठी
सज्ज़ झालेली आहेत. जळगांव जिल्ह्यात लागवड होणाऱ्या 42.43 लक्ष रोपांपैकी एकटया
वनविभागामार्फत सुमारे 65 टक्के म्हणजेच 27.32 लक्ष वृक्ष लागवड करण्यात येणार
आहे. अशी माहिती जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी दिली आहे.
000
No comments:
Post a Comment