जळगाव, दि. 15 - जलयुक्त शिवार अभियानातंर्गत सन 2018-19 मध्ये करण्यात येणारी कामे वेळेवर पूर्ण होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करुन सर्व कामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घेण्याचे निर्देश मृद, जलसंधारण व रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आज जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, मनरेगा अंतर्गत अपूर्ण विहिरींची कामे पूर्ण करणे आदी कामांचा आढावा सचिव श्री. डवले यांनी घेतला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, जळगावचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, यावलचे उप वनसंरक्षक संजय दहिवले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सचिव श्री. डवले म्हणाले की, आगामी पावसाळा लक्षात घेऊन जलयुक्त शिवार अभियानात सहभागी सर्व यंत्रणांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय राखून निवडण्यात आलेल्या गावांमधील कामे वेळेवर पूर्ण होतील यासाठी नियोजन करावे. या अभियानासाठी सन 2018-2019 मध्ये निवड केलेल्या गावांचे आराखडे, शिवार फेऱ्या आदि बाबी कालबध्द कार्यक्रमाप्रमाणे पूर्ण करावेत. तसेच या गावांमध्ये करण्यात येणाऱ्या कामांचे अंदाजपत्रक 31 जुलैपर्यंत तयार करुन प्रशासकीय मान्यता घ्यावी. तर 31 ऑगस्ट 2018 पर्यंत काम सुरु करण्याचे आदेश देण्यात द्यावेत. जेणेकरुन पावसाळा संपल्यानंतर लगेचच ही कामे सुरु करता येईल. त्याचबरोबर जलयुक्तची कामे करतांना शेतकऱ्याचे नाव, त्याचा गट नंबर व एकूण क्षेत्र याचीही माहिती घेण्याच्या सुचना सर्व यंत्रणांना दिल्यात.
यावेळी सचिव श्री. डवले यांनी जलयुक्त शिवार अतंर्गत सन 2017-18 मधील कृषी विभाग, वन विभाग, लघुसिंचन (जिल्हा परिषद), लघुसिंचन (जलसंधारण), भूजल सर्वेक्षण विभाग, पंचायत समिती (नरेगा), वनविभाग, सामाजिक वनीकरण आदी यंत्रणांमार्फत सुरु असलेल्या गावनिहाय, कामनिहाय व तालुकानिहाय निवडण्यात आलेली गावे, सुरु असलेली व प्रगतीपथावरील कामांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी सचिव श्री. डवले यांनी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, मनरेगाअंतर्गत अपूर्ण विहिरी पूर्ण करणे आदींचा आढावा घेतला. सन 2017-18 मध्ये जिल्ह्यात जलयुक्त शिवार अंतर्गत 4093 कामे प्रस्तावित असून त्यापैकी 4084 कामे सुरु आले तर 3398 कामे पूर्ण झाली आहे तर 689 कामे प्रगतीपथावर आहे. या कामांवर आतापर्यंत 147 कोटी 78 लाख रुपये खर्च झाला आहे. या कामांमुळे जिलह्यातील 64 गावे जलयुक्त झाली आहे. तसेच मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत जिल्हयाला 2 हजार शेततळयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी 1886 शेततळी पूर्ण झाली आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतंर्गत जिल्हयात 16 लाख 77 हजार 852 घनमीटर गाळ काढण्यात येणार असून आतापर्यत 5 लाख 56 हजार 344 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. नरेगा अंतर्गत एप्रिल 2018 पर्यंत जिल्ह्यात 2671 विहिरींची कामे अपूर्ण होती. त्यापैकी जूनपर्यंत 1450 विहिरींची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार 382 विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. तर 137 विहिरींचे कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती विविध यंत्रणांनी या बैठकीत दिली.
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय व तालुका कृषि अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह वनविभाग, जलसंधारण, लघुसिंचन, भुजल सर्व्हेक्षण आदि विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर सचिव श्री. डवले यांनी टेहू, ता. पारोळा येथे जलयुक्त शिवार अभियानातंर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. विवेक सोनवणे, उपसंचालक कृषि अनिल भोकरे उपस्थित होते.
000
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आज जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, मनरेगा अंतर्गत अपूर्ण विहिरींची कामे पूर्ण करणे आदी कामांचा आढावा सचिव श्री. डवले यांनी घेतला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, जळगावचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, यावलचे उप वनसंरक्षक संजय दहिवले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सचिव श्री. डवले म्हणाले की, आगामी पावसाळा लक्षात घेऊन जलयुक्त शिवार अभियानात सहभागी सर्व यंत्रणांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय राखून निवडण्यात आलेल्या गावांमधील कामे वेळेवर पूर्ण होतील यासाठी नियोजन करावे. या अभियानासाठी सन 2018-2019 मध्ये निवड केलेल्या गावांचे आराखडे, शिवार फेऱ्या आदि बाबी कालबध्द कार्यक्रमाप्रमाणे पूर्ण करावेत. तसेच या गावांमध्ये करण्यात येणाऱ्या कामांचे अंदाजपत्रक 31 जुलैपर्यंत तयार करुन प्रशासकीय मान्यता घ्यावी. तर 31 ऑगस्ट 2018 पर्यंत काम सुरु करण्याचे आदेश देण्यात द्यावेत. जेणेकरुन पावसाळा संपल्यानंतर लगेचच ही कामे सुरु करता येईल. त्याचबरोबर जलयुक्तची कामे करतांना शेतकऱ्याचे नाव, त्याचा गट नंबर व एकूण क्षेत्र याचीही माहिती घेण्याच्या सुचना सर्व यंत्रणांना दिल्यात.
यावेळी सचिव श्री. डवले यांनी जलयुक्त शिवार अतंर्गत सन 2017-18 मधील कृषी विभाग, वन विभाग, लघुसिंचन (जिल्हा परिषद), लघुसिंचन (जलसंधारण), भूजल सर्वेक्षण विभाग, पंचायत समिती (नरेगा), वनविभाग, सामाजिक वनीकरण आदी यंत्रणांमार्फत सुरु असलेल्या गावनिहाय, कामनिहाय व तालुकानिहाय निवडण्यात आलेली गावे, सुरु असलेली व प्रगतीपथावरील कामांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी सचिव श्री. डवले यांनी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, मनरेगाअंतर्गत अपूर्ण विहिरी पूर्ण करणे आदींचा आढावा घेतला. सन 2017-18 मध्ये जिल्ह्यात जलयुक्त शिवार अंतर्गत 4093 कामे प्रस्तावित असून त्यापैकी 4084 कामे सुरु आले तर 3398 कामे पूर्ण झाली आहे तर 689 कामे प्रगतीपथावर आहे. या कामांवर आतापर्यंत 147 कोटी 78 लाख रुपये खर्च झाला आहे. या कामांमुळे जिलह्यातील 64 गावे जलयुक्त झाली आहे. तसेच मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत जिल्हयाला 2 हजार शेततळयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी 1886 शेततळी पूर्ण झाली आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतंर्गत जिल्हयात 16 लाख 77 हजार 852 घनमीटर गाळ काढण्यात येणार असून आतापर्यत 5 लाख 56 हजार 344 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. नरेगा अंतर्गत एप्रिल 2018 पर्यंत जिल्ह्यात 2671 विहिरींची कामे अपूर्ण होती. त्यापैकी जूनपर्यंत 1450 विहिरींची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार 382 विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. तर 137 विहिरींचे कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती विविध यंत्रणांनी या बैठकीत दिली.
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय व तालुका कृषि अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह वनविभाग, जलसंधारण, लघुसिंचन, भुजल सर्व्हेक्षण आदि विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर सचिव श्री. डवले यांनी टेहू, ता. पारोळा येथे जलयुक्त शिवार अभियानातंर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. विवेक सोनवणे, उपसंचालक कृषि अनिल भोकरे उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment