Tuesday, 12 June 2018

जिल्ह्यातील हगणदारी मुक्त घोषीत नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान



            जळगांव दि. १२ :- जिल्ह्यात शासनाच्या नगरविकास विभागाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत हगणदारी मुक्त शहर (ODF) घोषीत केलेले नगरपरिषदांमधील मुख्याधिकारी यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार आज जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर, यांचे हस्ते करण्यांत आला.
            या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा प्रशासन अधिकारी राजेश कानडे, तहसिलदार महसुल मंदार कुळकर्णी, अ.का. नगरपालिका शाखा अजय कुळकर्णी आदि अधिकारी उपस्थित होते.
           सन्मान करण्यात आलेले अधिकारी चाळीसगांव/अमळनेर/भुसावळचे मुख्याधिकारी नगरपरिषद अनिकेत मानोरकर, सावदाचे मुख्याधिकारी नगरपरिषद सौरभ जोशी, पाचोरा मुख्याधिकारी नगरपरिषद किरण देशमुख, एरंडोल मुख्याधिकारी नगरपरिषद सचिन माने, धरणगांव मुख्याधिकारी नगरपरिषद श्रीमती सपना वसावा जामनेर मुख्याधिकारी नगरपरिषद श्रीमती शोभा बाविस्कर, फैजपुर मुख्याधिकारी नगरपरिषद श्रीमती सुवर्णा ओंगले शिंदे, भडगांव मुख्याधिकारी नगरपरिषद राहूल पाटील, रावेर /वरणगांव मुख्याधिकारी नगरपरिषद प्रशांत सरोदे, यावल मुख्याधिकारी नगरपरिषद सोमनाथ आढाव, बोदवड मुख्याधिकारी नगरपंचायत चंद्रकांत भोसले यांचा समावेश आहे.
                        राज्य शासनाने नुकतीच प्लॅस्टीक बंदी जाहिर केलेली आहे. त्यामुळे प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर बंद करून नैसर्गिकरित्या विघटीत होणाऱ्या कागदी व कापडी पिशव्यांचा वापर जनतेने करावा. यासाठी सर्व शासकिय अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त जनजागृती करावी.
                        तसेच राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम यशस्वी करतांना जास्तीत जास्त लागवड करावी असे जिल्हाधिकारी यांनी सर्व मुख्याधिकाऱ्यांना आवाहन केले. या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जळगांव येथील ना.म.काबरा फाऊंडेशन आणि विधायक कार्यकारी संघ यांच्या वतीने प्रत्येक नगरपरिषदेस १०० जांभळाची रोपे व १०० कापडी पिशव्या व ५०० कागदी पिशव्याचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले.
00000

No comments:

Post a Comment