जळगाव, दि. 4 - महाराष्ट्र शासनाच्या बियाणे व लागवड साहीत्य
उपअभियान मोहिमेतंर्गत कृषी विभागाच्या प्रचलित योजना अंतर्गत बियाणे प्रक्रिया व
साठवण केंद्र या बाबीसाठी अनुदान देणेकरिता शेतक-यांकडून अर्ज मागविणेत येत आहेत.
तर अनुदानाबाबत इच्छुक शेतक-यांना दि. 15 जून 2018 पर्यंत अर्ज प्रकल्प संचालक आत्मा, जळगाव
कार्यालयास सादर करावयाचे आहेत. विहित मुदतीनंतर अर्ज सादर केल्यास सदर लाभार्थी
अनुदानास पात्र राहणार नाही.
सदर योजनेतर्गत बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र
करण्यासाठी अनुदान देय आहे. सदर योजनेतर्गत जिल्हयास प्राप्त होणा-या भौतिक
लक्षांक आणि प्राप्त निधी यांच्या मर्यादेत लाभार्थी निवड करण्यात येईल. सदरील बियाणे प्रक्रिया व
साठवण केंद्र हे 500 मे. टन वार्षिक क्षमेतेचे असणे आवश्यक आहे.
सदर बीज प्रक्रीया केंद्रास रु. 60.00 लाख
किंवा प्रत्यक्ष उभारणीस येणारा खर्च यापैकी जे कमी असेल तितके अर्थसहाय्य देय
आहे. यासाठी 100 टक्के अर्थसहाय्य केंद्र शासनाकडुन उपलब्ध होणार आहे.
सदर प्रक्रीया केंद्रासाठी राज्यातील
शासकीय जमिनीवर, ग्रामपंचायतीच्या जमिनी, बियाणे उत्पादन संस्था, शेतकरी उत्पादन
कंपन्या (एफपीओ), स्वयंसहाय्यता गट ( एसएसजी) व सहकारी संस्था यांचेमार्फत उभारणी
केल्यास सदर अर्थसहाय्य देय राहील. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जळगाव यांनी
एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment