Monday, 25 June 2018

जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 179 दलघमी उपयुक्त पाणीसाठा


जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 179 दलघमी उपयुक्त पाणीसाठा
हतनूर धरणात 15.30 टक्के, गिरणात 50.76 टक्के तर वाघूर धरणात 86.89 टक्के उपयुक्त साठा.
हतनुर धरणातून 3133 व्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु. सहा गेट पूर्ण उघडण्यात आले.
जळगाव, दि : 25 - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडत अलेल्या पाऊसामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ होत असून आजपर्यंत एकूण 178.59 दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा आहे. या उपयुक्त साठयाची टक्केवारी एकूण उपयुक्त साठयाच्या 12.51 टक्के इतकी आहे. हतनूर धरण परिसरात गेल्या 1 जून पासून झालेल्या पाऊसामुळे धरणातून 3133 व्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु असून यामुळे धरणाचे 6 गेट पूर्ण उघडण्यात आले आहे. अशी माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहे. अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गुळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा मध्यम प्रकल्प आहे. तर 96 लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा 1427.51 दलघमी म्हणजेच 50.40 टीएमसी इतका आहे. 
जिल्ह्यातील मोठया प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 1027.10 दलघमी म्हणजेच 36.26 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 152.95 दलघमी म्हणजेच 5.40 टीएमसी उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर 15.30 टक्के, गिरणा 50.76 टक्के, वाघूर 86.89 टक्के उपयुक्त साठा आहे.
तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 203.91 दलघमी म्हणजेच 7.20 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 22.44 दलघमी म्हणजेच 0.79 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.
            गेल्या चोवीस तासात हतनूर धरणाच्या क्षेत्रात 5 मिमी इतका पाऊस पडल्याने हतनूर धरणातून 3133 व्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु असून यामुळे धरणाचे 6 गेट पूर्ण उघडण्यात आले आहे.         
000

No comments:

Post a Comment