Monday, 6 August 2018

अपंग व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार 14 ऑगस्टपर्यंत अर्ज पाठवावेत


        जळगाव, दि. 6 - अपंग व्यक्तींना देण्यात येणा-या राष्ट्रीय पुरस्कारासाठी केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाने सन 2018 च्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे. ज्या व्यक्तींना अर्ज करावयाचे आहे. त्या व्यक्तींनी अर्ज जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कार्यालयातुन 10 ऑगस्ट, 2018 पर्यंत प्राप्त करुन घ्यावे. असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगावं यांनी केले आहे.
            अर्जदाराकडील विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज दिनांक 14 ऑगस्ट, 2018 पर्यंत कार्यालयात स्वीकारण्यात येतील. अर्ज हा इंग्रजी किंवा हिंदी भाषेत असावा. विहित कालावधीनंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. अर्जाचा नमुना WWW.DISABILITYAFFAIRS.GOV.IN  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
            हा राष्ट्रीय पुरस्कार खालील बाबीसाठी देण्यात येतो. उत्कृष्ट कर्मचारी स्वयंउदयोजक अपंग व्यक्ती,  उत्कृष्ट नियुक्ती अधिकारी आणि सेवायोजन अधिकारी किंवा संस्था, अपंग व्यक्तींसाठी कार्य करणा-या उत्कृष्ट व्यक्ती व उत्कृष्ट  संस्था, प्रतीथयश व्यक्ती, अपंग व्यक्तीचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने केलेले उत्कृष्ट संशोधन उत्पादन/ निर्मिती, अपंग व्यक्तीच्या समक्षीकरणासाठी अडथळा विरहित वातावरण निर्मीती करणारे कार्यालय/ संस्था, अपंग व्यक्तीना पुनर्वसन सेवा पुरविणारा उत्कृष्ट जिल्हा, राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळाचे कार्य करणारी राज्य संस्था, उत्कृष्ट कार्य करणा-या प्रौढ अपंग व्यक्ती, उत्कृष्ट ब्रेल छापखाना, उत्कृष्ट सहज साध्य संकेतस्थळ, अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी प्रोत्साहीत करणारे उत्कृष्ट राज्य, क्रिडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी अपंग व्यक्ती यांना हे पुरस्कार देण्यात येतात.
        तरी जिल्ह्यतील जास्तीत जास्त अपंग व्यक्तींनी अर्ज प्राप्त करुन वेळेच्या आत सादर करावेत. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment