जळगाव, दि.29- जिल्हातील मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाच्या
प्रस्तावास मा. भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली आहे. निवडणूक आयोगाच्या
आदेशानुसार जिल्हयात मतदानकेंद्राच्या सुसूत्रीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला
होता. त्यानुसार ज्या मतदानकेंद्रास जोडलेल्या मतदारांची संख्या 1400 मतदारापेक्षा
अधिक होती तिथे अतिरिक्त नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले. तसेच मतदान
केंद्राच्या ज्या इमारती नादुरुस्त होत्या किंवा त्यांची पडझड झाली होती. अशा
मतदान केद्राऐवजी नवीन मतदान केंद्र जिल्हा निवडणूक शाखेने प्रस्तावित केले होते.
प्रस्तावित यादीवर नागरीकांकडून दावे व हरकती मागविण्यात आल्या होत्या व सदर
बदलाबाबत राजकीय पक्षांची बैठक देखील आयोजित करण्यात आली होती. मुदतीत कुठलीही
हरकत प्राप्त न झाल्याने सदर प्रस्ताव मंजुरीकामी मा. भारत निवडणूक आयोगास सादर
करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हयातील काही मतदान केंद्राना जोडलेल्या मतदारांची
संख्या 1400 पेक्षा अधिक झाल्याने तेथे
प्रस्तावित नवीन मतदान केंद्रामुळे जिल्हयातील मतदान केंद्राच्या संख्येत आता 172
ने वाढ होवून एकूण मतदान केंद्रांची संख्या 3532 इतकी झालेली आहे. तर जुन्या व
नादुरस्त इमारती असलेल्या 283 मतदान केंद्रांची इमारत बदलण्यात आलेली आहे. सदर
बदलाची नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हानिवडणूक अधिकारी
जळगाव श्री. किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment