जळगाव,
दि. 15 - कृषि विभाग व कावेरी सिड्स
यांच्या संयुक्त विद्ममाने कापूस पिकावरील गुलाबी व शेंदरी बोंड अळीच्या निवारण व
नियंत्रणासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी तयार करण्यात आलेल्या
चित्ररथाला राज्याचे कृषि व फलोत्पादन, पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री
ना. सदाभाऊ खोत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.
जिल्ह्यात
मागील वर्षी कापूस पिकावर मोठया प्रमाणात गुलाबी व शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव
झाला होता. यावर आतापासूनच नियंत्रण यावे याकरीता कृषि विभागाच्यावतीने
शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. याकरीता जिल्ह्यातील विविध गावांमध्ये
चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असून या चित्ररथाचे उद्घाटन येथील
कृषि विभाग कार्यालयाच्या आवारात आज ना.
खोत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर,
महापालिका आयुक्त् चंद्रकांत डांगे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर,
कृषि उपसंचालक अनिल भोकरे, उपविभागीय कृषि अधिकारी गोरख लोखंडे यांचेसह कृषि
विभागाचे अधिकारी, कर्मचारी व विविध बी बीयाणे उत्पादक कंपन्याचे प्रतिनिधी
उपस्थित होते.
यावेळी
ना. खोत यांनी जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयास भेट दिली. याप्रंसगी कृषि उपसंचालक
अनिल भोकरे यांनी ना. खोत यांना चालू खरीप हंगामात जिल्ह्यातील पीकांची
सद्यपरिस्थिती तसेच उपलब्ध खते, बी बीयाणे व इतर बाबींची माहिती दिली. याप्रसंगी
ना. खोत यांच्या हस्ते जिल्ह्यातील निवडक शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप
करण्यात आले.
000
No comments:
Post a Comment