जळगाव,
दि. 6 - यवतमाळ जिल्ह्यात मागील वर्षी
किटकनाशक फवारणीमुळे दुखद घटना घडली होती. त्याची पुनरावृत्ती जिल्ह्यात होवू नये.
यासाठी किडनाशकांचा सुरक्षित वापर व हाताळणी विषयी शेतकरी बांधवांनी जागृत राहुन दिलेल्या
सूचनांनुसार किटकनाशकांची फवारणी करावी. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक
कृषि अधिकारी यांनी केले आहे.
हे करा :- नेहमी स्वच्छ पाणी वापरा,
संरक्षक कपडे वापरा. उदा हातमोजे, चेह-याचा मास्क, टोपी, ऍप्रन, पूर्ण विजार, इ.
जेणेकरुन पूर्ण शरीर झाकले जाईल. नाक, डोळे, कान, हात यांना कीटकनाशकाचा स्पर्श
होणार नाही याची काळजी घ्या, कीटकनाशकाच्या डब्यावर लिहिलेले निर्देश
वापरण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचा. गरजेनुरतेच द्रावण तयार करा, पूड स्वरुपात असणारी
कीटकनाशके ही अशीच वापरावीत. फवारणीची टाकी भरतांना कीटकनाशक आजूबाजूला सांडणार
नाही याची दक्षता घ्या. दिलेल्या प्रमाणातच कीटनाशके वापरा, तुमच्या जीवाला धोका
निर्माण होईल अशी कोणतीही कृती करु नका. सांगितलेले प्रमाण आणि द्रावण वापरा. शांत आणि थंड दिवशी फवारणी करा, साधारणत:
व्यवस्थित उजेड असलेल्या दिवशी फवारणी करा. फवारणी वा-याच्या दिशेने करावी. फवारणी
झाल्यानंतर उपकरणे आणि बादल्या स्वच्छ पाणी आणि साबण वापरुन धुवावीत. फवारणी
झाल्यानंतर लगेचच कोणत्याही पाळीव प्राण्याला/ व्यक्तीला शेतात जाऊ देऊ नये. प्रत्येक
फवारणीसाठी आवश्यक ते फवारणी यंत्र वापरा.
हे
करु नका - गढूळ किंवा घाण पाणी वापरु नका,
संरक्षक कपडे वापरल्याशिवाय कधीही फवारणी द्रावण तयार करु नका, शरीराच्या
कोणत्याही भागावर कीटकनाशक पडणार नाही याची काळजी घ्या. निर्देश न वाचता कधीही
कीटकनाशक वापरु नका, तयार केलेले द्रावण 24 तासांनंतर कधीही वापरु नका, पूड कधीही
पाण्यात मिसळू नका, फवारणीच्या टाकीचा कधीही वास घेऊ नका, जास्त प्रमाणात
कीटकनाशके वापरु नका, त्यामुळे पिकांना व पर्यावरणाला धोका निर्माण होतो,
कीटनाशकांचे काम पूर्ण होईपर्यंत काहीही खाऊ पिऊ नका तसेच धुम्रपान करु नका किंवा
काहीही चघळू नका, कधीही सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त आणि उच्च तीव्रता असलेले
कीटकनाशक वापरु नका, उष्ण आणि भरपूर वारा असलेल्या दिवशी फवारणी करु नका,
पावसाच्या अगदी आधी किंवा लगेचच नंतर फवारणी करु नका, वा-याच्या विरुध्द दिशेने
फवारणी करु नका, कीटकनाशके मिसळण्यासाठी वापरलेले डबे, बादल्या व्यवस्थित धुतल्यानंतर
कधीही घरगुती वापरासाठी घेऊ नयेत. संरक्षण कपडे घातल्याशिवाय नुकतीच फवारणी
केलेल्या शेतात जाऊ नये. किटकनाशक विषबाधेची लक्षणे आढळून आल्यास,
विषबाधा झालेल्या व्यक्तीस रुग्णालयात दाखल करतांना वापरलेल्या किटकनाशकाची बॉटल /
पाकीट सोबत नेण्यात यावे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment