जळगाव,
दि. 31 - औरंगाबाद क्षेत्रा
संबंधीत टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा
आठवड्याच्या आत झाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी पोस्टमास्तर जनरल,
औरंगाबाद यांनी त्यांच्या कार्यालयात दिनांक 25 सप्टेंबर, 2018 रोजी दुपारी 2.00
वाजता डाक अदालतचे आयोजन केले आहे.
नागरिकांनी आपल्या तक्रारी संपूर्ण माहितीसह दोन प्रतीत एस.
एस. परळीकर, सहाय्यक निदेशक डाकसेवा (ज. शि) पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय,
औरंगाबाद - 431002 या पत्त्यावर दि. 12 सप्टेंबर, 2018 पुर्वी पोहोचेल अशा बेताने
पाठवाव्यात. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहितीसाठी www.maharashtrapost.gov.in
या संकेतस्थळास भेट द्यावी, असे पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद क्षेत्र, औरंगाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment